यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना संजय राठोड
महाराष्ट्र

यवतमाळमधील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्र मिळून करतायत बाप्पाची आराधना

यवतमाळमधील मुस्लिम समाजातील युवक गणेशमूर्तीची स्थापना करतायत. अनेक वर्षांपासून मुस्लिम-हिंदू युवक मिळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करतायत.

वृत्तसंस्था

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: मुस्लिम समाजातील युवक गणेशोत्सव साजरा करतात असे म्हटलं तर कोणाचाच विश्वास बसणार नाही, मात्र हो यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये मुस्लिम समाजातील युवक हिंदू समाजातील युवकांना सोबत घेऊन दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. (Hindu-Muslim brothers in Yavatmal worship Bappa together)

हे देखील पहा -

सुरूवातीला मुस्लिम समाजातील काही युवकांनी गणेशमुर्ती बसवविण्याबाबत हिंदू समाजातील युवकांना कडे भावना बोलून दाखवली. त्यानंतर हिंदू समाजातील युवकांनी चांगली संकल्पना सुचविली असे म्हणुन होकार दिला आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. गेल्या दहा वर्षांपासून गारपीट गणेश उत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. या मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि ७० टक्के पदाधिकारी हे मुस्लिम समाजातील युवक आहेत. सुरूवातीला आरती वैगरे येत नव्हती, मात्र आता मुस्लिम समाजातील युवकांना आरती देखील मुकपाठ असल्याने दोन्ही वेळेच्या आरत्या तेच म्हणतात.

हिंदू आणि मुस्लिम समाजात चांगला संदेश देण्याचे काम गारपीट गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी गणेशोत्सवाच्या माध्यमातून करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

IPL 2026 qualifier-1 : क्वालिफायर १ सामना पावसात वाहून गेला तर...; कोणता संघ फायनलमध्ये धडकणार? जाणून घ्या समीकरण

Maharashtra News Live Update: परभणीत पेट्रोल पंप चालकांडून पंपावर पोलिस बंदोबस्ताची मागणी

Ranveer Singh: रणवीर सिंहला 'डॉन 3'मधून एक्झिट घेणं पडलं महागात; FWICEने अभिनेत्याला इंडस्ट्रीमधून केलं बॅन

पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं: मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT