Hansraj Ahir  Saam Tv
महाराष्ट्र

Hansraj Ahir: 'मोदी सरकारचं धोरण, शेतकऱ्यांचं मरण'; भाजप नेते हंसराज अहिर यांना शेतकऱ्यांनी घेरलं

Hansraj Ahir Yavatmal Visit : हंसराज अहिर यवतमाळ दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी त्यांना घरलं आहे. विविध प्रश्नांवरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rohini Gudaghe

Farmers Question To Hansraj Ahir

ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir) यवतमाळ दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. यवतमाळच्या लोणी गावात माजी मंत्री आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'मोदी सरकारचं धोरण, शेतकऱ्यांचं मरण' असं म्हणत ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना शेकतऱ्यांनी सुनावलं आहे.

आमच्या शेतमालाला भाव का मिळत नाही. कोरोना काळात सर्व उद्योग बंद होते. मात्र, शेती हा व्यवसाय सुरू होता. तुम्ही एकीकडे म्हणता की, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, अन् दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत आमच्या मागण्या का पोहोचवत नाही, असे प्रश्न शेतकऱ्यांनी त्यांना विचारले (Farmers Question To Hansraj Ahir) आहेत.

हंसराज अहिर यांना शेतकऱ्यांचे सवाल

आम्हाला चालायला रस्ता नाही. सिंचनासाठी लाईट मिळत नाही, अशाने शेतकरी वर्ग कशा जगेल? एक रुपयात आम्ही पीक विमा काढला. मात्र, पुढे पिक विम्याचं काय झालं ते समजलंच नाही. घर चलो अभियानांतर्गत हंसराज अहिर लोणी या गावाच्या दौऱ्यावर होते. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं (Hansraj Ahir Yavatmal Visit) होतं.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका केली. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल खोटं सांगितलं आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. ते खुल्या प्रवर्गातील असून ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा संबंध नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधींवर टीका

1994 मधे गुजरात सरकारने मोध घांची जातीला ओबीसीमधे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मी तीनही पुरावे समोर आणले आहेत, असं म्हणत हंसराज अहीर यांनी राहुल गांधी यांचे आरोप खोडून काढले आहेत. राहुल गांधी यांनी लावलेल्या आरोपात तथ्य नाही. त्यांनी केलेले आरोप बिनआधाराचे असल्याचं त्यांनी म्हटलं (Hansraj Ahir News) होतं.

राहुल गांधी यांचा आरोप खोटा आहे. फक्त प्रसिद्धीसाठी त्यांनी हा आरोप आहे. मोदींच्या काळात ओबीसीला न्याय मिळत आहे. अशा पद्धतीने झालेलं विधान हे विकृत मानसिकतेतून केलेलं विधान आहे, असं मला वाटतं असंही हंसराज अहीर म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT