Rahul Gandhi On Share Market Price 
महाराष्ट्र

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Rahul Gandhi: विधानसभा निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी महायुतीवर हल्लाबोल केलाय.. त्यातच गुजरातने महाराष्ट्रातील 5 लाख नोकऱ्या पळवल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.. नेमकं राहुल गांधी काय म्हणाले आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचलाय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच संविधान बचावच्या मुद्द्याबरोबरच राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्याला हात घालत भाजपवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून गुजरातला जाणा-या उद्योगाच्या मुद्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. गुजरातने महाराष्ट्रातील तब्बल 5 लाख नोकऱ्या पळवल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात करार झालेले उद्योग महायुतीचं सरकार आल्यानंतर गुजरातने पळवल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. मात्र आता राहुल गांधींनी महायुती सरकारच्या काळात गुजरातने पळवलेल्या नोकऱ्यांची कुंडलीच जाहीर केलीय..

'गुजरातने पळवल्या 5 लाख नोकऱ्या'

वेदांता फॉक्सकॉन - 10 हजार रोजगार

टाटा एअरबस - 10 हजार रोजगार

आयफोन प्रकल्प - 75 हजार रोजगार

बल्क ड्रग्ज पार्क- 80 हजार रोजगार

गेल पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट- 21 हजार रोजगार

इतर प्रकल्प- 3 लाख रोजगार

एकूण - 5 लाख रोजगार

लोकसभा निवडणुकीत संविधान बचावसोबत महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला होता. त्यानंतर आता राहुल गांधींनी महाराष्ट्रातील रोजगार गुजरातने पळवल्याचं सांगत त्याची आकडेवारीच मांडल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे महायुती राहुल गांधींच्या टीकेला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT