Ajit Pawar GBS Chicken Statement Expert reaction Saam Tv
महाराष्ट्र

GBS News : चिकन खाल्याने खरंच जीबीएस होतो का? अजित पवारांच्या विधानावर तज्ज्ञांचं मत काय? वाचा

Ajit Pawar GBS Reason Chicken Statement : चिकन खाल्यामुळे जीबीएसचा धोका असल्याचे विधान अजित पवार यांनी काल केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

GBS Reason : राज्यामध्ये जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. जीबीएसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या आजारामुळे राज्यात आतापर्यंत बारा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिकन खाल्याने जीबीएसचा धोका वाढत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जीबीएस हा रोग कुठल्याही जंतू किंवा बॅक्टेरिया किंवा व्हायरसपासून होत नाही. काही विषाणू अन्नपदार्थामार्फत आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार बळावण्याची जास्त शक्यता असते. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच कारणांमुळे जीबीएस आजार होतो हे निष्पन्न झाले आहे.'

'पण फक्त मांसाहार केल्याने जीबीएस होत नाही. जीबीएसचा धोका टाळण्यासाठी दूषित मांस तसेच उघड्यावरचे अन्न खाणे टाळा. शिजवलेले मांस खा. जर एखाद्या कोंबड्यामध्ये जीबीएसचा जिवाणू असेल तरच माणसाला याची लागण होऊ शकते. पण प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला याची लागण होईल असे नाही. जीबीएस विषाणूमुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईल असेही नाही', असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

'काही मधल्या काळात जीबीएस आजार उद्भवला. तो पाण्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे आल्याचे वाटले होते. पण खडकवासला परिसरात काहींच्या मते कोंबड्याचं मांस खाल्याने हा आजार झाला. त्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. त्या परिसरातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. पण ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजं, मांस कच्चं राहायला नको' असे काल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. चिकन खाल्याने जीबीएस होत असल्याच्या बातम्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसून त्यातून उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मुळात चिकन शिजवताना ते १०० डिग्री सेल्सियस तापमानावर उकळवले जाते. त्यामुळे त्यात विषाणू जिवंत राहूच शकत नाही. या बातम्यांमुळे चिकनचे भाव पडण्यास सुरुवात झाली आहे असे विधान गोडांबे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT