Rajesh Tope, Coronavirus, coivd-19, corona, jalna saam tv
महाराष्ट्र

Corona चा धाेका वाढला आहे, सरकार काय करतेय, गांभीर्याने घ्या ! माजी आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी सूचविले उपाय

कुठल्याच प्रकारची तयारी राज्यात सुरू असल्याचे दिसत नाही असेही राजेश टाेपेंनी नमूद केले.

लक्ष्मण सोळुंके

Rajesh Tope News : सरकार कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचा गंभीर आराेप माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope criticizes maharashtra government) यांनी जालना (jalna) येथे केला आहे. सरकार आणि टास्क फोर्समध्ये कुठला ही समन्वय असल्याचं दिसून येत नाही असेही टोपेंनी नमूद केले. (Maharashtra News)

टाेपे म्हणाले गेल्या दोनशे दिवसात राज्यामध्ये सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्यामुळे देशाचे केंद्रीय मंत्री यांनी घेतलेला आढावा बैठकीमध्ये रिव्ह्यूज आणि माॅक ड्रिल बाबत महत्वाचा सूचना केलेल्या आहेत.

वाढती रुग्ण संख्या पाहता राज्यात स्थानिक पातळीवर बेड पासून ते ऑक्सीजन बेड पर्यन्त सुविधा निर्माण करण्याची तयारी असायला हवी हाेती. त्याचं बरोबर अशा परिस्थितीत वाढती रुग्ण संख्या पाहता डॉक्टर्स यांना प्रशिक्षण देणे महत्वाचे हाेते. या कुठल्याच प्रकारची तयारी राज्यात सुरू असल्याचे दिसत नाही.

त्याच बरोबर स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाधीत रुग्णांना आयसोलेट करणं महत्वाचं आहे. मात्र तसल्या कुठल्याच सुविधा तयार होत नसल्याने ही गंभीर बाब असल्याचे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे.

राज्य सरकार आणि टास्क फोर्समध्ये कुठला ही समन्वय असल्याचं दिसून येत नसल्याचा ही गंभीर आरोप यावेळी टोपे यांनी केला. सरकार कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता कोरोनाला गंभीरतेने घेत नसल्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lapandav Video : सखीची खरी आई कोण? 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रेक्षकांना बसला धक्का

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT