Beed News : गोदावरी नदीच्या पुराचा फटका आता गाव खेड्यातील नागरिकांना बसू लागला आहे. गोदावरी नदीला (river) मिळणाऱ्या गाव खेड्यातील नद्यांना देखील आता काहीसं पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळेच आता बीड येथील गव्हाणथडी गावचा (village) संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी गावाला जाताना गाव नदी आहे. या नदीवर कमी उंचीचा पुल असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना पाण्यातून ये जा करावी लागत आहे. आता गोदावरी नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या गोदावरी नदीला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्या देखील नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली आहे.
यामुळे या नद्यांना देखील पुराचे स्वरूप आलं आहे. यामुळे दळणवळणाचा मोठा गंभीर प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. ज्यांचे महत्त्वाचे काम आहेत त्यांना अक्षरक्ष: याच पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ पुलाची उंची वाढवून प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते अशी भिती देखील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.