Maharashtra: पुरामुळे कांदळी गावातील १५० कुटूंब बेघर संजय राठोड
महाराष्ट्र

Maharashtra: पुरामुळे कांदळी गावातील १५० कुटूंब बेघर

जिल्ह्यातील कांदळी या गाव लगत नाल्याला रात्रीच्या दरम्यान पूर आल्याने गावातील १५० कुटूंबातील नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : जिल्ह्यातील कांदळी या गाव लगत नाल्याला रात्रीच्या दरम्यान पूर आल्याने गावातील १५० कुटूंबातील नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. दिग्रस तालुक्यातील कांदळी गावातील १५० घरांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे परिसरात रात्रभर विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. कांदळी येथील १५० कुटूंबातील नागरिकांना पुराचा फटका बसल्याने अन्न- धान्य सह जीवनावश्यक वस्तू सर्व खराब झाल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.

हे देखील पहा-

रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे यवतमाळ मधील दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात नाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात पाणी आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नागरिक जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.परिसरात नाल्याचे पाणी आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नागरिक आणि जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.

दिग्रस तालुक्यातील कांदळी येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे १५० कुटूंबातील नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडले आहे. दरम्यान डिग्रस चे तहसीलदार यांनी रात्रीच्या दरम्यान तांदळी गावाला भेट देऊन, पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर पुराच्या पाण्यात 150 कुटुंबातील नागरिकांना इतर ठिकाणी हालवून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT