Samruddhi Mahamarg, Potholes saam tv
महाराष्ट्र

Potholes On Samruddhi Mahamarg : अपघातांची मालिका सुरुच... समृद्धी महामार्गावरील खड्डे कधी बुजणार? प्रशासनास सवाल

Buldhana News : छाेट्या छाेट्या खड्ड्यांमुळे अपघात घडताहेत असे वाहनधारकांनी सांगितले.

संजय जाधव

Samruddhi Mahamarg News : आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून आणि 55 हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम सात महिने झाले आहेत. पण पहिल्याच पावसाळ्यात या महामार्गावर काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. (Maharashtra News)

त्यामुळे या महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहने अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील विविध मार्गावरील खड्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत होता आता मात्र समृद्धी महामार्गा वरील खड्याचा (potholes) प्रश्न उपस्थित झाला आहे.

या खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याची तक्रार वाहनधारक करु लागले आहेत. या महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून टाकावेत म्हणजे ख-या अर्थाने त्यास समृद्धी मार्ग (samruddhi mahamarg) म्हणता येईल असेही वाहन धारकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT