मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालाय... घर, दार सगळं पाण्यात गेलंय... या शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सत्ताधारी शिंदेसेनेच्या हिंगोलीतील पदाधिकारी राम कदम या असंवेदनशील पदाधिकाऱ्याचा हा कारनामा बघा...
हिंगोलीत अतिवृष्टीने आसणा नदी पात्राबाहेर गेलीय.. शेतकऱ्यांची घरं पाण्यात आहेत..अनेक गावांचा संपर्क तुटलाय..मात्र राम कदम या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याने गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्या लावणीचा कार्यक्रम ठेवला.. या कार्यक्रमाला थिल्लरपणा करणाऱ्यांनीही मोठी गर्दी केली.. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला.. मात्र शेतकरी अन्न पाण्याविना हतबल झाला असताना सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी पैशांची उधळपट्टी करत बेभान झालेत...त्याचा थेट उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतलाय...
मुद्दा फक्त हिंगोलीचाच नाही... अशीच पैशाची उधळपट्टी परभणी कृषी विद्यापीठातही पाहायला मिळालीय... ही दृष्य पाहा... ही गाण्याची मैफिल... हा खाण्यापिण्याचा बडेजाव.... आणि मागे दिसणारी विद्युत रोषणाई... ही दृश्य आहेत परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील... खरंतर कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असतात.. मात्र परभणीच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरु हेच विसरलेत.. शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं असताना आणि शेतकरी टाहो फोडताना परभणीच्या कृषी विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवादाच्या नावाने उधळपट्टी सुरुय... त्यामुळे उधळपट्टी करणाऱ्या असंवेदनशील कुलगुरुंना पदावरुन हटवण्याची मागणी जोर धरु लागलीय..
मराठवाड्यात 24 तासात 141 मंडळात अतिवृष्टी झालीय. .. शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असताना धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी गाण्यावर ठेका धरतात.. कुठे सत्ताधारी पक्षाचे नेते गौतमी पाटील आणि माधुरी पवारांना नाचवतात... तर कृषि विद्यापीठात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं जातंय.. त्यामुळे आपत्तीच्या प्रसंगात, शेतकरी कोलमडून पडला असतानाही हे नेते, अधिकाऱ्यांमध्ये एवढी असंवेदनशीलता येतेच कुठून....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.