talathi office  
महाराष्ट्र

तलाठी वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयास ठाेकले टाळे

अभिजीत घोरमारे

भंडारा : ऐन शेतीच्या हंगाम सुरु असताना तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांचे पीक पेरा भरून सात बारा मिळत नाही या कारणास्तव छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेच्या मार्फत शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत चक्क तलाठी कार्यालयाला talathi office कुलूप लावल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गुरढा येथे घडली आहे. या आंदाेलनात शेकडो शेतकरी उपस्थित होते. farmers-gurda-talathi-office-bhandara-marathi-news

धान खरेदी केंद्रावर नोंदणीची घाई सुरु झाली असून खरीप हंगामातील शेतकरी नोंदणीची मुदत ही सप्टेंबर अखेरपर्यंत आहे. त्यामुळे शेतकरी आपली नोंदणी व्हावी या उद्देशाने ई पीक पाहणी वर माहिती भरून कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. परंतु संबंधित तलाठ्यांनी सात बारा देण्यासाठी आजची (ता. 20) तारीख दिली होती. त्यामुळे शेकडो शेतकरी हे कार्यालयात हजार झाले होते. येथे तलाठीच वेळेवर न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सझा क्रमांक 18 तलाठी कार्यालयाला कुलूप लावून टाकले. कामात हलगर्जीपणा करणारे तलाठी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर मोहतूरे यांनी केली.

यावेळी एकच गोंधळ उडाला होता. अखेर पालांदुर येथील मंडल अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांची समजूत काढत लवकर सातबारा देण्याचे आश्वसन मिळाल्यावर जमाव शांत झाला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे आंदाेलन

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

SCROLL FOR NEXT