Marriage | विवाह  SaamTvNews
महाराष्ट्र

उन्हाचा अतिरेक, पाणीटंचाईने लग्नांना ब्रेक!

चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी नांदगाव या गावाच्या व्यथेने ग्रामीण भागातील असुविधांचे नागडेपण स्पष्ट झाले आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : पाणी टंचाईमुळे (Water Scarcity) गावातील मुलांचे लग्नच (Marriage) जुळत नसल्याचे धक्कादायक वास्तव चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात उजेडात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी नांदगाव या गावाच्या व्यथेने ग्रामीण भागातील असुविधांचे नागडेपण स्पष्ट झाले आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थ प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

हे देखील पाहा :

मात्र, निगरगट्ट प्रशासनाने ग्रामस्थांच्या व्यथा कानाआड केल्यात. वैतागलेल्या पालक आणि मुलांनी प्रशासनाकडे आपलं दुखणं मांडल; मात्र परिस्थिती जैसे थे आहे. इथले इच्छूक वर "बाबा लगीन" म्हणून ओरडत असले, तरी गावातील पाणी टंचाईमुळं मुलींचा या गावात यायला नकार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चेकनांदगाव प्रादेशिक पाणी पुरवठा (Water Supply) योजनेतून सात गावाना पाणीपुरवठा केला जातो. या गावापर्यंत अंथरलेली भूमिगत जलवाहिनी जागोजाग फुटली आहे. त्यामुळे नळांना येणारं पाणी गढूळ असतं. तर काही भागात नळ येतच नाहीत, अशी भीषण स्थिती आहे. हेटी नांदगाव येथील गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अल्प आहेत. काही विहीरी आहेत; मात्र त्यातील पाणी पिण्यास योग्य नाही. या स्थितीत गावापासून दूर असलेल्या नाल्यात खड्डा खोदून तिथल्या पाण्याने गावकरी तहान भागवतात.

ज्या नाल्यातून गावकरी पाणी भरतात, तो नाला गोंडपिपरी-सिरपूर राज्य मार्गावर आहे. रोज डोक्यावर हंडा आणि तासनतास पाण्याची प्रतीक्षा यामुळे महिलांच्या एकूण कामाचे तास आणि शेतशिवारातील कामे यावर विपरीत परिणाम झालाय. आता गावातील सोयरीकी रखडल्याने हेटी नांदगावातील नागरिकांनी प्रशासनाकडे आर्त विनवणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT