#परीक्षांचाधंदाथांबवा : ऐनवेळी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांनी रात्र काढली रेल्वेस्टेशनवर अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा : ऐनवेळी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांनी रात्र काढली रेल्वेस्टेशनवर

ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला

अॅड. जयेश गावंडे

अकोला : ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवरच रात्र काढावी लागली आहे.

पहा व्हिडिओ-

आज परीक्षा असल्याने अनेकांनी अकोला गाठले होते. परीक्षा रद्द झाल्याचे समजताच रात्री उशिरा घरी परतण्यास मार्ग नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी रात्र रेल्वेस्थानकावरच काढल्याचे शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास अनेक विद्यार्थी फिरताना दिसून आले आहेत. आरोग्य विभागाची परीक्षेसाठी अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोट आदी परीक्षा केंद्र असल्याने राज्यभरातून विद्यार्थ्यांनी अकोला गाठले होते.

तब्बल 300 ते 400 कि.मी.चा प्रवास करून, अकोला या ठिकाणी पोहोचल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अनेक मुलींचाही सहभाग होता. अनेकांना वेळेवर लॉज, रूम उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांनी रेल्वेस्थानकावर रात्र काढावी लागली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

SCROLL FOR NEXT