२०२५-२६ मध्ये चार वर्षांत दोन पदव्या मिळवण्याची विद्यार्थ्यांना संधी  Saam Tv
महाराष्ट्र

2 degrees After HSC : फक्त ४ वर्षांत २ पदव्या, HSC नंतर नवीन संधी

New Course Proposal : सोलापूर विद्यापीठाचा इंटिग्रेटेड बीएड कोर्स प्रस्ताव एनसीटीईकडे पाठवण्यात आला आहे. इयत्ता बारावी विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि बीए़़ड एकत्र करण्याचा हा प्रस्ताव आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेच प्रवेशाची संधीही मिळेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने इयत्ता बारावी विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि बीए़़ड एकत्र करण्याचा प्रस्ताव एनसीटीई कडे पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यास २०२५-२६ हा कोर्स सुरु केला जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना चार वर्षात दोन पदव्या मिळू शकतील. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने इंटिग्रेटेड पदवी व बीएड अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव २०२४ मध्ये 'एनसीटीई'ला पाठवला.

कोर्सचा कालावधी: ४ वर्षे ( बीए-बीएड, बीकॉम-बीएड, बीएस्सी-बीएड).

विद्यार्थ्यांना लाभ: ५ ऐवजी ४ वर्षात दोन पदव्या मिळतील.

प्रवेश क्षमता: प्रत्येकी १०० विद्यार्थी, एकून ३०० विद्यार्था.

सध्याच्या बीएड महाविद्यालयांना २०२९ पर्यंत नवीन धोरणानुसार बदल करणे बंधनकारक असणार आहे. तसेच, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेच प्रवेशाची संधीही मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT