Political tensions escalate in Solapur as BJP leaders allege a murder conspiracy after ZP election results Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपच्या नेत्याचा रक्तरंजित हत्येचा कट? राजकीय वर्तुळात भीतीचे सावट

BJP Leader Murder Conspiracy Allegation In Solapur: जिल्हा परिषद निकालानंतर भाजप नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय.. मात्र हा आरोप कुणी केला... हा भाजपचा नेता कोण? आणि हत्येचा आरोप कुणावर करण्यात आलाय.

Bharat Mohalkar

जिल्हा परिषदेचा निकाल लागला... सोलापूरमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली... मात्र आता निवडणूक रक्तरंजित कऱण्याच्या कटाबाबतच्या आरोपांच्या फैरी सुरु झाल्यात... माळशिरस तालुक्यात विरोधकांकडून भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खळबळ उडवून दिलीय.. एवढंच नाही तर राम सातपुतेंच्या हत्येच्या कटाचा पोलीस तपासही सुरु झाल्याचं गोरेंनी सांगितलंय..

गोरेंच्या आरोपानंतर या वादात आणखी ट्विस्ट आलाय... भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी तर थेट पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीच आपल्या हत्येचा कट रचला, असा आरोप केलाय.... तर मोहिते पाटलांनी राम सातपुतेंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावलेत...

दुसरीकडे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या म्हणण्यानुसार झेडपी निकालाच्या वेळी राम सातपुते यांनी पराभूत उमेदवार बाबा मानेंच्या तोंडावर गुलालाची गन मारली.. त्यामुळेच त्यांच्यात बाचाबाची झाली... मात्र हत्येच्या कटाचा आरोप जानकरांनी फेटाळून लावलाय..खरंतर महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृततेची परंपरा आहे... अनेकवेळा राजकीय मतभेद आणि वैयक्तिक संबंध वेगळे असल्याचं चित्र पाहायला मिळालंय.. मात्र नगरपालिका निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाने बिहारच्या जंगलराजच्या दिशेनं वळण घेतलंय... कारण अनेक नेत्यांवर जीवघेणे हल्ले आणि हत्या झाल्याचं समोर आलंय..

अकोल्यात काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांची राजकीय वादातून हत्या कऱण्यात आली.. तर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिंदेसेनेच्या सुधाकर घारे यांचीही राजकीय हत्या कऱण्यात आली... शिंदेसेनेच्या हाजी अलीम कुरेशी यांच्यावरही अकोल्यातच वार करण्यात आले... मुंबईतील वांद्रे भागातही शिंदेसेनेच्या हाजी अकील यांच्यावर चाकूने वार कऱण्यात आले.. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं...

आता प्रश्न पडतोय की, महाराष्ट्राची वाटचाल जंगलराजच्या दिशेनं होत असेल तर त्याला पायबंद घालण्याची गरज आहे... एवढंच नाही तर राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातील सत्य शोधण्यासाठी पोलीसांनी ही तपास करुन दूध का दूध आणि पानी का पानी कऱण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी? फडकवला बांगलादेशचा झेंडा! भाजपकडून निषेध

सुनेत्रा पवारांनी भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाहांचं ट्विट | VIDEO

माझा हत्येचा कट रचला जातोय; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

आता आमदार, खासदारही बरखास्त होणार! काय आहे 'राईट टू रिकॉल कायदा? कोणी केली नव्या कायद्याची मागणी?

गुरुजीच झाले 'कॉपी बहाद्दर',12 वीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी

SCROLL FOR NEXT