Dhule Corporation News Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation News: धुळ्यात पाणी प्रश्न पेटला; महापालिका प्रशासनाविरोधात 'हंडा बजाव' आंदोलन

धुळ्यात पाणी प्रश्न पेटला; महापालिका प्रशासनाविरोधात 'हंडा बजाव' आंदोलन

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असून धुळेकरांना (Dhule) प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सत्ताधाऱ्यांमार्फत वारंवार फक्त आणि फक्त खोटे आश्वासन (BJP) दिले जात असल्याचा आरोप लावत पालिका प्रशासनाला पाणी प्रश्न संदर्भात जाग आणण्यासाठी हंडा बजाव आंदोलन हे आजाद समाज पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

धुळे शहरात पाणी प्रश्‍न सातत्‍याने उद्‌भवत असतो. उन्‍हाळा सुरू असताना शहरात आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. महापालिकेवर असलेल्या बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी प्रश्‍न सोडविण्याचे खोटी आश्वासन देत धुळेकरांची निव्वळ फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांतर्फे लावण्यात आला.

महापालिकेला दिला इशारा

यावेळी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभागी होत पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये पाणी प्रश्न संदर्भात असलेला आक्रोश व्यक्त करत पालिका प्रवेशद्वाराबाहेर मडके फोडून संताप व्यक्त केला आहे. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत तीन दिवसानंतर पिण्याचा पाण्याचा पुरवठा नियमित सुरू न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांतर्फे पालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast cancer warning signs: महिलांनो.. स्तनाच्या त्वचेत हे ५ बदल होत असतील तर व्हा सावध; ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असू शकतो

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Konkan Travel : कोकणात ट्रेकिंगसाठी ठिकाण शोधताय? मग 'हे' लोकेशन एकदा पाहाच

Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Sanjay Raut: ठाकरें बंधूंच्या युतीचा हनुमान; संजय राऊतांचा सन्मान, ठाकरेंसाठी राऊत महत्वाचे का?

SCROLL FOR NEXT