लग्न म्हटलं की गाणी, हसणं-खेळणं आणि जेवणाच्या पंगती हे सगळं आलंच...पण कधी कधी या अशी काही गोष्ट घडते ज्यामुळे लग्नाचं सगळं चित्रच बदलून जातं. असाच काहीसा प्रकार तिरपोळे गावात झालेल्या एका लग्न सोहळ्यात घडला आणि आनंदाचा माहोल क्षणात तणावात बदलला.
तिरपोळे गावात मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा सुरू होता. मंडपात नातेवाईक, गावकरी आणि पाहुण्यांची गर्दी होती. जेवणावळीची व्यवस्था सुरू असताना काही पाहुण्यांनी “आमच्या लोकांना जेवण का वाढत नाही?” असा सवाल उपस्थित केला. हा साधा प्रश्न होता, पण त्यावरूनच वादाला ठिणगी पडली.
सुरुवातीला हा वाद फक्त बाचाबाचीपुरता मर्यादित राहील असं वाटत होतं. पण काही क्षणांतच दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांसमोर उभे ठाकले आणि तिखट शब्दांची देवाणघेवाण थेट शिवीगाळीपर्यंत पोहोचली. लग्नमंडपातच एकच गोंधळ उडाला आणि पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली.
या वादाचे रूपांतर अचानक हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर हात उचलल्याने लग्नसोहळ्याचा आनंद क्षणात नाहीसा झाला. या मारहाणीत एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार करण्यात आला. तो व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीये. उपस्थितांनी मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली. अखेर या घटनेनंतर मेहुणबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही तक्रार सरदार झबुलाल ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेला हा प्रकार गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.