Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : भर पावसाळ्यात पाणी टंचाई, महिलांना करावी लागतेय भटकंती; ६ महिन्यापासून गावात समस्या

Buldhana News : पाणी पट्टी भरूनही सरपंच व ग्रामसेवक यांचा हेकेखोरपणा सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून धरण उशाशी तर ग्रामस्थ उपाशी अशी अवस्था बुलढाणा जिल्ह्यातील सावरखेड ग्रामस्थांची आहे

संजय जाधव

बुलढाणा : उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत असते. उन्हाळ्याचे साधारण दोन- अडीच महिने टंचाईला सामोरे जावे लागल्यानंतर पावसाळ्यात पाण्याची समस्या कमी होत असते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने उलटून देखील गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र चिखली तालुक्यातील सावरखेड गावात पाहण्यास मिळत आहे. यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. शिवाय मे महिन्यातील अवकाळी पावसाने देखील सर्वत्र पाण्याची समस्या दूर झाली होती. दरम्यान चिखली तालुक्यातील काही धरणे, गाव तलाव जेमतेम भरले आहेत. तर पेन टाकळी ओव्हरफ्लो झाले आहे. अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक असताना देखील गावात भर पावसाळ्यात देखील पाणीटंचाई जाणवत आहे. 

सहा महिन्यांपासुन समस्या कायम 

गेल्या ६ महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केला जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाणीपट्टी कर भरला असून घरपट्टी कर काही जणांचे राहिले आहे. या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे. 

विहिरीवरून आणावे लागतेय पाणी 

साधारण १ हजार लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे. त्याला पाणी नाही. त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा; अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

Raisin Price : चिनी बेदाण्याने मार्केट खाल्ले; महिन्याभरापासून बेदाणा दरात घसरण, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Maharashtra Live News Update: माधुरी हत्तीणीबाबत वनताऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची चर्चा

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई, एकाच पदासाठी दोघांकडून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नियुक्ती

Amruta Khanvilkar : अमृताने पटकावला पहिला राज्य चित्रपट पुरस्कार,'चंद्रमुखी'चं सर्वत्र होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT