Buldhana Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Heavy Rain : बुलढाण्याच्या तीन तालुक्यात अतिवृष्टी; एक लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान

बुलढाण्याच्या तीन तालुक्यात अतिवृष्टी; एक लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) एक लाख हेक्टरवरील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. परिसरात आज पावसाने (Buldhana) विश्रांती घेतली असली तरी अद्यापही अतिवृष्टीची दहशत या भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आहे. (Maharashtra News)

संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक हेक्टरवरील पिके सध्या ही पाण्याखाली आहेत. तर संग्रामपूर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. थोडक्यात म्हणजे संग्रामपूर जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात हे नुकसानीचे दृश्य दिसत आहे. गावात असो किंवा शेतात सगळीकडे काही ना काही प्रमाणात प्रत्येक नागरिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त संग्रामपूर तालुक्याला बसला असून या तालुक्यात जवळपास ४० हजार हेक्‍टरवरील पिकाचं नुकसान झाले आहे. प्रशासनाने या तिन्ही (Sangrampur) तालुक्यात पंचनामे सुरू केले असून खासदार प्रतापराव जाधव यांनी या परिसराचा आज दौरा केला व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. 

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाला आहे तर हजारो घरांची पडझड झालेली आहे मात्र राज्य शासनाचा एकही प्रतिनिधी या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी (Farmer) झाल्यानंतर 24 तासातही पोहोचला नव्हता त्यामुळे नागरिकात रोष आहे.. संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसला. बावणबीर गावातील केदार नदीला महापूर आला होता. यामुळे मात्र अनेक शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. परिसरातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिके एक तर पाण्याखाली आहेत किंवा जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभे राहिलेला आहे.

जळगाव तालुक्यातील जामोद गावचे गजानन ढेनगाळे यांचे चार एकर शेतीतील कापसाचे पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. अतिवृष्टीमुळे यांच्या शेताची अक्षरश: नदी झालेली आहे आणि ही नदी खरवडून गेलेली आहे. त्यामुळे चार एकर कापसाचे पीक पूर्णपणे निस्तनाबूत झालेला आहे. या शेतकऱ्याचे जवळपास चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान सध्या झाले असून शेतीतील माती ही खरवडून गेल्यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात कायमचं नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT