दोन तालुक्यातील जोडणारा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

दोन तालुक्यातील जोडणारा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील श्रीपतपिंपरी Sripatpimpari गावाच्या अलिकडे असणाऱ्या, बार्शी Barshi अन् माढा Madha तालुक्याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरुन bridge मागील पंधरा दिवसांपासून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थ Villager प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण- वळण सुरु आहे. पुलाला कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने, जीव मुठीत घेऊन सर्वजण जाताना दिसत आहेत. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

हे देखील पहा-

बार्शी तालुक्यातील कुसळंब, घोर ओढा, कासारवाडी, कोरफळे, अलिपूर, खांडवी Khandvi या ठिकाणी लहान- मोठ्या ओढ्यातून पाणी श्रीपतपिंपरी या ठिकाणी असलेल्या ओढ्याला येत असल्याने वर्षातील आठ महिने वाहत असतो. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ZP अखत्यारित या ओढ्याचे काम झाले आहे. दोन वर्षापूर्वी डागडूजी करण्यात आली होती. पण ओढ्याची उंची मात्र, वाढवण्यात आली नाही.

बार्शी तालुक्यात मोठा पाऊस झाला की ओढ्यावरुन पाणी वाहणे सूरू होते. 31 मे पासून ओढ्यात मुबलक पाणी येत आहे. अन् ओढा वाहत आहे. दरम्यान पाणी वाहत असल्यामुळे ओढ्याच्या दोन्ही कडेच्या बाजूला शेवाळे झाले असून, चालत अथवा दुचाकी जात असताना घसरुन पडण्याच्या अनेक घटना घडत आहेत. तर मागील वर्षी एक जणाचा वाहून जाऊन मृत्यू झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT