Supreme Court  Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: छत्रपती संभाजीनगर, धाराशिवच्या नामांतरविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; शिंदे सरकारला दिलासा

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २ ऑगस्ट २०२४

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

राज्य सरकारने उस्मानाबादचे नामांतर 'धाराशिव' तर औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात दाखल झालेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयाच्या विरोधात याचिकाकर्त्यांने सुप्रीम कोर्टात अपिल केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

निव्वळ राजकिय हेतूनंच हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकेमध्ये म्हटले होते. यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. ज्यामध्ये कोर्टाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेले आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे.

कोर्टाने काय म्हटलं?

नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेले आहेत. जेव्हा नाव देण्याचे अधिकार असतात तेव्हा नामांतर करण्याचे सुद्धा अधिकार असतात. नाव बदलले की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच. अलाहाबाद व औरंगाबाद प्रकरण सारखे नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT