ओबीसी आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे चक्काजाम आंदोलन  विजय पाटील
महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे चक्काजाम आंदोलन

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील पुष्पराजचौक येथे भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विजय पाटील

सांगली : मराठा Maratha आणि ओबीसी OBC आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण Reservation जाण्यास जबाबदार ठरवत भाजपकडून BJP राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात जागे करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील Sangli पुष्पराजचौक येथे भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

हे देखील पहा -

या चक्का जाम आंदोलनात भाजपच्या आमदारांसह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज दहा वाजल्यापासून हे चक्काजाम आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तर या मोर्चाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक, भाजपचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली आहे.

या आंदोलनात अठरा पगड जाती, बार बलुतेदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी सांगितली. अठरा पगड जाती आणि बार बलुतेदार यांच्यावर या सरकारने अन्याय केला असल्याचे देखील पडळकर म्हणाले. विविध समुदायातले हे लोक पारंपरिक वेशभूषेत हे आंदोलन करणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity Relief Food: पित्ताचा त्रास वाढतोय? सकाळच्या नाश्त्यात घ्या हा १ पदार्थ, अ‍ॅसिडीटी होईल गायब

Monday Horoscope: कामात कौतुकाची थाप मिळेल, 5 राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी संधी

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT