nana patole SaamTv
महाराष्ट्र

कोरोना काळात हत्याकांड घडवण्याचे काम भाजपने केले - नाना पटोले

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : जसे जालियानवाला बाग हत्याकांड घडले होते त्याच पद्धतीने या कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात जे लोक मरण पावले, त्यांच्या मृत्यूस सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

हे देखील पहा -

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. खामगाव येथे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या विजय संकल्प कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

अफगाणिस्तानच्या अराजकतेवर बोलताना ते म्हणाले कि, अफगाणिस्तानमध्ये जे काही घडलं आहे, ते केवळ धार्मिकेतच्या नावावर घडले आहे. अफगाणिस्थानातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत. अफगाण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार सर्वस्वी मदत करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT