अर्धापूर तालुक्यातील कोरोना पिडीतांना मदत 
महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त व कोरोनात बळी पडलेल्या कुटुंबासाठी भोई फाऊंडेशन सरसावले

पुणे येथील शंकरराव भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकारातून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील पाल्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : पुण्यातील भोई फाऊंडेशन सुरु केलेल्या पुण्यजागर प्रकल्पाचे यंदा चौथे वर्ष असून यंदाही अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृती मिळणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे आध्यक्ष डाॅ मिलिंद भोई यांनी रविवारी ( ता. चार ) दिली. शहरातील भगवान लंगडे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पालक, पाल्य, पुण्यजागर प्रकल्पाचे हितचिंतक, पत्रकार यांचा मेळावा घेण्यात आला.

पुणे येथील शंकरराव भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकारातून अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील पाल्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पातून शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी शैक्षणिक, आरोग्यासाठी मदत देण्यात येते. विद्यार्थ्यांनी शिष्यवृती, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी शिवनकला प्रशिक्षण, शिवनयंत्राचे वाटप आदी सहकार्य केले जाते.

हेही वाचा - शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

शहरातील भगवान लंगडे यांच्या निवास्थानी आढवा बैठक, स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत डाॅ मिलिंद भोई, सुधाकर टाक, डाॅ वैभव पुरंदरे, डाॅ लोखंडे, डाॅ उज्ज्वला पुरंदरे, जोशी, टोम्पे आदी उपस्थित होते. अर्धापूर तालुक्यातील कोंढा, देळूब, मालेगाव, अर्धापूर, नांदला दिग्रसा, धामदरी येथील शेतकरी कुटुंब उपस्थित होते. या बैठकीत उपक्रमांची माहिती व गेल्या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती नांदेड जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे यांनी दिली.

कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या काही गरजु पाल्यांची जबाबदारी भोई फाऊंडेशनने घेतली असून अशा पाल्यांना पूण्यजागर प्रकल्पात सहभागी करुन त्यांना शैक्षणिक व आरोग्याची मदत देण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी सहकार्य करण्यात येते अशी माहिती डाॅ मिलिंद भोई यांनी दिली.

या मेळाव्यात आर. आर. देशमुख, प्रवीण देशमुख ,व्यंकटी राऊत, छत्रपती कानोडे, प्रा. रघुनाथ शेटे, गोरखनाथ राऊत, पंडित लंगडे, सचिन काळे, दत्ता टोकलवाड, नामदेव बटेवाड, गोविंद टेकाळे, रामराव भालेराव, निळकंठ मदने, सखाराम क्षिरसागर, उध्दव सरोदे आदी उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गुणवंत विरकर, नागोराव भांगे, शेख साबेर, गजानन मेटकर, नवनाथ ढगे यांनी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT