बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांना सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटी दरम्यान (Soldier Death) वीरमरण आले. यानंतर त्यांचे पार्थिव गावी आणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पांडुरंग तावरे यांना अखेरचा निरोप (Beed) द्यायला जनसागर लोटला होता. (Maharashtra News)
चार दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये ढगफुटी झाली. या ढगफुटी दरम्यान गंगटोक परिसरात तिस्ता नदीला आलेल्या पुरात भारतीय सैन्य दलाच्या तुकडीतील २३ जवान पुरात वाहून बेपत्ता झाले होते. त्यापैकीच पांडुरंग तावरे हे देखील बेपत्ता होते. आपत्कालीन परिस्थितीत देशसेवेत कर्तव्य बजावताना पांडुरंग तावरे यांना वीरमरण आले. शोधकाऱ्यानंतर तावरे यांचे पार्थिव सापडल्यानंतर त्यांच्या मूळगावी आणण्यात आले.
अमर रहेचा नारा
आज पांडुरंग वामन तावरे यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव काकडहिरा या ठिकाणी आणण्यात आले. यावेळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागराने शहीद पांडुरंग तावरे अमर रहे..अशा घोषणा दिल्या. दरम्यान त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.