Pankaja Munde News: 'आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडेन', कार्यकर्त्यांसाठी पंकजा मुंडे कळवळल्या!
Beed Loksabha Election Result News: Saamtv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: 'आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडेन', कार्यकर्त्यांसाठी पंकजा मुंडे कळवळल्या!

विनोद जिरे

बीड, ता. १६ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. आज या आत्महत्या केलेल्या कुटुंबांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी मृतांच्या कुटुंबियांना पाहून पंकजा मुंडे यांनाही अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीडच्या आष्टी तालुक्यातील इंदेवाडी आणि डिघोळआंबा येथील तरुणाने आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली.

यातील चिंचेवाडी येथील वायबसे कुटुंबाला भेत घेत मुंडेंनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी पंकजा मुंडे यांना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोटला. तर पंकजा मुंडे यांनाही अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना आता आत्महत्या करू नका, तर मला लढण्यासाठी बळ द्या, असे समर्थकांना आवाहन केले आहे.

तसेच जर आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईल, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले असून आगामी शंभर दिवसात हे सगळे चित्र बदलून टाकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आज बीड जिल्ह्यात आज आणखी एका मुंडे समर्थकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बीडच्या शिरुर कासार तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT