नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईकांचे नाव देण्याची बंजारा नेत्यांची मागणी  Saam Tv
महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईकांचे नाव देण्याची बंजारा नेत्यांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने राजकारण तापले असताना मुंबई विमानतळाला स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे अशी यवतमाळ येथील बंजारा नेत्यांची मागणी समोर आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यावर शिवसेना ठाम आहे. मात्र लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले असतानाच आता या वादात स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे नाव जोडले जात आहे. Banjara leaders demand New Mumbai airport be named after Vasantrao Naik

हे देखील पहा -

वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे सतत साडे अकरा वर्षे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. वसंतराव नाईकांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. शिवाय नवी मुंबई निर्माण करण्यामध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे.

रोजगार हमी योजना हे त्यांचीच देण मानली जाते. अश्या विविध कल्याणकारी कार्यातून महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोलाचा वाट असलेल्या वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी आता बंजारा समाजातील नेते करू लागले आहेत.

वसंतराव नाईक हे अजूनही बंजारा समाजासाठी दैवतच आहेत. बंजारा समाजाचे असलेले माजी वनमंत्री संजय राठोड याना पूजा चव्हाण प्रकरणात काही महिन्यापूर्वी राजीनामा द्यावा लागला होता. आज घडीला ठाकरे मंत्रीमंडळात बंजारा समाजाचा एकही प्रतिनिधी नाही. महाराष्ट्रात जवळपास दीड कोटी बंजारा समाजाचे लोक आहेत.

असे असूनही समाजास प्रतिनिधित्व नाही यामुळे आघाडी सरकारवर समाज काहीसा नाराज असून मुख्यमंत्रांकडे आम्ही नामांतरामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा विचार करुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे अशी समाजाची मागणी असल्याचे घुमंतूक महासभा प्रदेश अध्यक्ष मनीष जाधव यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT