बाळासाहेब थोरात SaamTV
महाराष्ट्र

एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती साहित्यिक बोलत नाहीत - बाळासाहेब थोरात (पहा Video)

'लेखकांची ताकद मोठी असते, म्हणून जिथं चुकत तिथे लेखकांनी लिहिलं पाहिजे. राजकारण बदलवण्याची ताकद लेखकांमध्ये असते.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : आज 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समोरोप प्रसंगी भाषण करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी कंगणा रनौतसह विक्रम गोखलेंवरती निशाना साधतच साहित्यिकांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली.

पहा व्हिडीओ -

थोरात आपल्या भाषणामध्ये म्हणाले, 'स्वातंत्र्याची ज्योत गांधींनी आणि टिळकांनी लिखाणातून दिली. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास कोणी पुसू शकत नाही. मात्र एक बाई या स्वातंत्र्याला त्याला भीक म्हणते आणि त्या बाईच्या वक्तव्याला महाराष्ट्रातील एक कलाकार समर्थन देतो मात्र यावरती कोणी साहित्यिक बोललं नाही याचं वाईट वाटलं अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी या साहित्यिकांच्या समोर बोलून दाखवली.

तसेच या संमेलनाची सुंदर साहित्य संमेलन म्हणून नोंद होईल. देशात व देशाबाहेर साहित्य संमेलन जाऊन पोहोचलय. नाशिकच्या मातीला साहित्याचा इतिहास संतांची परंपरा पुढे नेण्याचं काम गोदाच्या पाण्यात आणि नाशिकच्या मातीत आहे. लेखकांची ताकद मोठी असते, म्हणून जिथं चुकत तिथे लेखकांनी लिहिलं पाहिजे. राजकारण बदलवण्याची ताकद लेखकांमध्ये असते. भारतात चुकीचं घडत असेल तर लेखकांनी Author जागरूक राहिले पाहिजे त्यावर लिहिलं पाहिजे. कट्टरवाद वाढला आणि त्यातून मते मिळवायचे असे सध्या सुरू आहे. राज्यघटनेप्रमाणे देश चालला पाहिजे यासाठी राजकारणी काम करतात मात्र आम्ही जिथं कमी पडत असू तिथं लेखकांनी लिहिलं पाहिजे असही थोरात आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime news: झोपेत पाय लागल्याने तरुण भडकला; डोक्यात दगड घालून मजुराची हत्या, सोलापुरात खळबळ

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! २६ लाख लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होण्याची शक्यता; तुम्हाला मिळणार की नाही?

Maharashtra News Live Update: नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर

Kolhapur Tourism : शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'हा' गड 'सापांचा किल्ला' म्हणून प्रसिद्ध

Mumbai Drug Party: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला अटक; बँक खात्यातून 7 महिन्यात 50 लाखांची उलाढाल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT