ऐकलतं... शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहारच्या बच्चू कडूंनी आता आरपारचा लढा उभारण्याची घोषणा केलीय... सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात 28 ऑक्टोबरला नागपुरात बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन होणारेय... त्यामुळे यावेळी सरकारनं लेखी निर्णय दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान या आंदोलनासाठी ट्रॅक्टर घेऊन शेतकरी बांधवही नागपूरच्या दिशेने रवाना झालेत.. जागोजाठी आंदोलनासाठी शेळ्या, मेंढ्या घेऊन जाणारे शेतकरी पाहयाला मिळतायत... तर आंदोलनाच्या तयारीसाठी विदर्भातील अनेक गावांमध्ये 'चिवडा'ही तयार केला जातोय.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही राज्यात आंदोलनं झालेत..त्यातच आता बेलोरा ते नागपूर असा 182 किलोमीटरचा प्रवास करून शेतकरी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडणार आहेत.. त्यामुशे शेतकऱ्यांच्या लोकशक्तीचा हा झंझावात सरकारला आपल्या मागण्याची दखल घेण्यास भाग पाडतो का? महाएल्गार आंदोलनाला राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा पाठींबा मिळालेला असल्यानं हे आंदोलन किती यशस्वी होते.. हे पाहणं महत्त्वाचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.