Traffic Rules Saam tv
महाराष्ट्र

Traffic Rules: वाहतुक नियमांचे उल्लंघनाच्‍या वर्षभरात चार लाख कारवाया; ई-चलानचे २१ कोटी थकबाकी

वाहतुक नियमांचे उल्लंघनाच्‍या वर्षभरात चार लाख कारवाया; ई-चलानचे २१ कोटी थकबाकी

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात होणाऱ्या दंडात्मक कारवाईत पारदर्शकता आणि सुलभता यावी; या उद्देशाने ई चलान यंत्रणा सुरू (Aurangabad News) करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ १० टक्के दंडाचीच वसुली झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. (Live Marathi News)

वाहतुकीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या विरोधात वाहतुक पोलिसांकडून (Traffic Police) कारवाईचा बडगा उचलला जातो. उल्‍लंघन करणाऱ्यांना दंड देखील आकारला जातो. त्‍यानुसार वाहतुक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर म्हणजेच मागील वर्षभरात शहर परिसरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ लाख ९२ हजार ६०१ नियमबाह्य वाहनांवर २६ कोटी ९५ लाख ३४ हजार ४५० रुपयांचा ई-चलानद्वारे दंड लावला. मात्र, त्यापैकी केवळ १ लाख ७ हजार ६१४ चलानधारकांनी ५ कोटी ७१ लाख २२ हजार ६५० रुपये दंड भरला.

२१ कोटी दंड थकित

तर २ लाख ८४ हजार ९९० चलानधारकांनी २१ कोटी २४ लाख ११ हजार ८०० रुपयांचा भरणाच केला नाही. परिणामी दंड न भरणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांवर पोहोचलेे आहे. यामुळे ई-चलान केवळ दिखावा असल्याचे दिसून येतय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT