Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद महानगरपालिकेचं नवं पाऊल; अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी बायोमास विटांचा वापर

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - पर्यावरण संवर्धनासाठी औरंगाबाद (Aurangabad) महानगरपालिकेने एक नवीन पाऊल टाकलं आहे. शहरातील २६ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आता लाकडाऐवजी बायोमास विटांचा वापर केला जाणार आहे. सगळीकडे अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर केला जात असल्याने वृक्षतोडीसोबतच पर्यावरण (Environment) प्रदूषणाचा प्रश्न हळूहळू चर्चेला येत आहे. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) त्यावर एक उपाय शोधून एक नवं पाऊल टाकलं आहे.

हे देखील पहा -

औरंगाबाद शहरातील २६ स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पुढच्या काळात लाकडाऐवजी शेतीच्या वेस्टपासून तयार केलेल्या बायोमास विटांचा वापर लवकरच सुरू केला जाणार आहे. स्मशानभूमींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळपास चार क्विटल लाकडाची गरज असते. त्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होते.

लाकडाचा वापर कमी करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पर्यायी वस्तूंचा वापर करण्याचा ठराव डिसेंबर महिन्यामध्ये घेतला होता. त्यानुसार आता शेतमालातील वेस्टपासून बनवलेल्या विटांचा वापर करण्यात येणार आहे. औरंगाबाद महापालिकेने पर्यावरण रक्षणासाठी जरी लाकडाला पर्यायी वस्तू वापरण्याचा निर्णय घेतला असला तरी नागरिकांकडून त्याला प्रतिसाद कसा मिळतो, हे पहावं लागेल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT