अतुल लोंढे यांनी गृहमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष नसल्याचा आरोप केला.
पुण्यात गॅंगवॉर सुरु असून नागपूरातही गुन्हेगारी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
खासदारांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत देशाचा विचार करून मतदान करावं अशी सूचना केली.
राज्य सरकारकडे जनतेच्या सुरक्षेकडे गंभीरतेने लक्ष नाही अशी काँग्रेसची टीका.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज राज्य सरकारवर आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य केले.
लोंढे म्हणाले की, खासदारांनी सदसद्विवेकबुद्धीचा वापर करावा आणि देशाचा विचार करून मतदान करावं. बहुमत असतानाही यापूर्वी उपराष्ट्रपती निवडणुकीत वेगळे निकाल लागले आहेत, यावेळेसही तसंच होईल. ते नागपूर येथे बोलत होते.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप लोंढे यांनी केला. ते म्हणाले, पुण्यात गॅंगवॉर सुरु आहे, नागपूरातही अशीच परिस्थिती आहे. गृहमंत्र्यांचं लक्ष या विषयाकडे नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.