अतिक्रमण हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला; अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार Saam TV
महाराष्ट्र

अतिक्रमण हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला; अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार

पोलीस (Police) व वनविभागाच्या लाठी चार्ज दरम्यान 50 पेक्षा अधिक गावकरी देखील जखमी झाले आहेत

संदिप नागरे

हिंगोली : हिंगोलीत शेतकऱ्यांनी वनविभागाच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीच्या (Hingoli) पातोंडा गावातील शिवारात हा प्रकार घडला असून या घटनेत वन विभागाचे दोन अधिकारी व नऊ कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) हल्ल्याला प्रत्युत्तर देताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा हवेत गोळीबार करत गावकऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे.

पोलीस (Police) व वनविभागाच्या लाठी चार्ज दरम्यान 50 पेक्षा अधिक गावकरी देखील जखमी झाले आहेत तर एका शेतकऱ्याने अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध करत घटनास्थळावर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्या वर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी बासंबा पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पातोंडा गावात पोलीस दंगा नियंत्रण पथक व पोलीस अधिकारी तळ ठोकून आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT