Maharashtra Politics 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंच्या सूचनेवरुन मनोज जरांगेशी संवाद, त्यानंतर माघार; असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या माघारीबाबत सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Asim sarode on Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या माघारीबाबत सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, असा दावा असिम सरोदे यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी माघार घेतला, त्याचा खूप मोठा फायदा आहे, असेही सरोदे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला. उमेदवारही दिले, त्यांनी राजकीय मोट बांधण्यास सुरुवातही केली. पण अचानक उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. आता मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्याचं कारण समोर आलेय. असिम सरोदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मध्यरात्री चर्चा केली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. असिम सरोदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याआधी याबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं याबाबत मत जाणून घेतलं होतं. या सर्व गोष्टींचा खुलासा असिम सरोदे यांनी बारामती येथील आपल्या भाषणादरम्यान केला.

बारामतीमध्ये असिम सरोदे काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत बोलत असतात, ते माझ्या ऑफिसमध्येही आले होते, याबाबत मी शरद पवार यांना सांगितले होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, ते बोलत असतील तर तुम्ही संवाद करायला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही बोलणं झालं, तेही चांगलेय म्हणाले.

त्यानंतर मग आम्हाला वाटलं, ७८ सभा घेतल्या. आता विधानसभेच्या निवडणुकीत काय सुरु होणार? मराठा समाजाच्या नावाखाली इतके लोकं उभे राहत असतील, तर मतांचे विभाजन होणार. मत विभाजनाचा फायदा कुणाला होणार? त्यामुळे मी मनोज जरांगे यांच्याकडे गेलो. रात्री साडेअकरापासून तीन वाजेपर्यंत आमची वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली.

मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा आरक्षणासाठी जे मोर्चे काढले, ते महत्त्वाचे सामाजिक काम आहे. तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून रचनात्मक काम करणारा माणूस म्हणून हीच भूमिका कायम ठेवा. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करावेत, असे कुणा कुणाला वाटत होते, त्यांनी मी त्याची यादी काढण्यास सांगितली. देवेंद्र फडणवीस यांची सर्वात आधी इच्छा होती. लक्ष्मण हाके, महाजन यासारखे नेते होते. समाजात फूट पाडू नका... असा सल्ला त्यांना दिला. त्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT