मुख्यमंत्र्यांचा राजधानीला न्याय, उपराजधानीवर अन्याय? आशिष देशमुखांचा सवाल  Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा राजधानीला न्याय, उपराजधानीवर अन्याय? आशिष देशमुखांचा सवाल

आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला

मंगेश मोहिते

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ताकर माफ केलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजधानीला दिलेला न्याय ते उपराजधानी नागपूरला का लागू करत नाही असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

हे देखील पहा -

मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब स्थायिक झाले आहे. त्या सर्वांचे घर 500 वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशी मागणी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक; गटनेतेपदाच्या निवडीसाठी होणार बैठक

Heart Attack: झोपण्याआधी फक्त १ ग्लास पाणी प्या अन् निरोगी राहा, हार्टअटॅक अन् स्ट्रोकच्या रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी

Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा? पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

Hair Fall: केस गळतीवर घरीच करा 'हा' १ सोपा उपाय, १५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT