Apple Farming 
महाराष्ट्र

Akola News: अकोल्यात सफरचंद शेतीला फटका! वाऱ्यामुळे सफरचंद गळून पडले; तर गहू, मकासोबत इतर पिकांनाही मोठा फटका

Apple Farming: अकोल्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यात अवकाळी पावसाने हाहा:कार माजवला आहे. विशेषतः ऐदलापूर शेत शिवारातील सफरचंद शेतीला मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

Dhanshri Shintre

अक्षय गवळी/साम टीव्ही न्यूज

अकोल्यातल्या तेल्हारा आणि अकोट तालुक्यातल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर शेत शिवारात सफरचंद शेतीला मोठा फटका बसला आहे. नवनीत चांडक यांच्या सफरचंद शेतीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अक्षरशः झाडाला लागलेले सफरचंद वाऱ्यामुळे गळून पडले. दरम्यान तेल्हारा तालुक्यातल्या हिंगणी, दानापूर, तळेगाव बाजारसह आदी गावांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा आणि केळी बागा देखील वाऱ्यामुळे उध्वस्त झाले. रात्री उशिरा तेल्हारा आणि अकोट तालुक्यात अवकाळी पावसासह जोराचा वारा झाला होता. याच वाऱ्यामुळे अक्षरशः मका आणि केळी बागासह पपई बाग उध्वस्त झाल्या. शेतात तोडणी करून कापणीसाठी ठेवलेल्या मका पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे.

दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यात पावसाचा तडाका पाहायला मिळाला आहे. या आधीही अकोल्यातल्या मुर्तीजापुर बार्शीटाकळी आणि बाळापूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्या पाठोपाठ आता तेल्हार्याला आणि अकोट तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पुन्हा बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

कालचं बाळापुर तालुक्यात शेतकऱ्यांचं होतं नुकसान

बाळापुर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर होता. याशिवाय सोबत वारा देखील वाहत होता. या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दरम्यान, वाऱ्यामुळं केळी बागा पडल्या होते. अनेक केळीचे घड अक्षरश: मातीत भिजल्या गेल्याने पूर्णतः नुकसान झालं आहे. जवळपास एकरी ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांच नुकसान झालं.

अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यावर आली होती, मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडं ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली होती. तर काढणी करून कापण्यासाठी ठेवण्यात आलेला कांदा पिकाचे देखील शेतातलं मोठं नुकसान झालं होतं. तामशी गावातच शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान पाहायला मिळालं होतं. मिथुन काळे या शेतकऱ्याचा जवळपास ४०० क्विंटल कांदा पूर्णतः पाण्यात भिजला गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT