Akola News  Saam Tv
महाराष्ट्र

Akola: शेतात जाताना अनर्थ घडला, मण्यार सापाचा दंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू; १५ दिवसांतील दुसरी घटना

Women Died After Snakebite: अकोल्यामध्ये मण्यार सापाच्या दंशाने महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पहाटे शेतामध्ये जात असताना वाटेमध्ये मण्यार सापाने दंश केला. उपचारादरम्यान या महिलेने प्राण सोडले.

Priya More

Summary -

  • अकोल्यामध्ये महिला शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.

  • मण्यार सापाच्या दंशाने महिला शेतकऱ्याने गमावला जीव.

  • पहाटे शेताकडे जात असताना मण्यार सापाने दंश केला.

  • १५ दिवसांत अकोल्यात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना घडली

अक्षय गवळी, अकोला

अकोला जिल्ह्यातील मुंडगाव गावात सर्पदंश झाल्याने एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास शेतात निंदन करण्यासाठी त्या घरातून निघाल्या होत्या. वाटेतच त्यांना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव या गावात ही घटना घडली. बेबीनंदा मधुकर वानखडे (५५ वर्षे) असं मृत शेकतरी महिलेचं नाव आहे. शेतामध्ये जात असताना त्यांना मण्यार सापाने दंश केला आण त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वीच बेबीनंदा यांचे पती मधुकर वानखडे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्या स्वतः शेतामध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायच्या. त्यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुलं अविवाहित आहेत. तसेच ते सतत आजारी पण असतात. त्यामुळं बेबीनंदा ही शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायची.

याआधी देखील अकोल्यामध्ये सर्प दंशाने एका तरुणीचा मृत्यू झाला होता. अकोल्यातील पळसो बढे गावात सर्पदंश झाल्याने १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. घरात गाढ झोपेत असताना या तरुणीला मन्यार जातीच्या सापाने दंश केला होता. रुपाली गोवर्धन खांडेकर असं या मृत तरुणीचे नाव होतं. उपचारादरम्यान रुपालीचा मृत्यू झाला होता. रुपाली घरातील खोलीत गाढ झोपेत असताना तिच्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची तिला जाणीव झाली. त्यानंतर मण्यार या विषारी सापाने तिला दंश केल्यामुळे रूपालीने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला होता.

दरम्यान, पावसाळा येताच साप चावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पावसामुळे सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात आणि राहण्यासाठी जागा शोधतात. सुरक्षित जागेच्या शोधात अनेकदा साप घरातील कोपऱ्याच्या खोलीत किंवा एखाद्या ठिकाणी आसरा घेत असतात. अशावेळी अनावधानाने आपण तिथे जातो आणि साप चावतो. गेल्या १५ दिवसांत अकोल्यामध्ये सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT