अक्षय गवळी
अकोला : अकोल्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत असून अकोल्यातल्या बाळापुर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक भागात वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. अकोला जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या पावसामुळे प्रामुख्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतातील पिकांचे वारा व पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
हजारो क्विंटल कांद्याचे नुकसान
सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अकोल्यातल्या बाळापुर तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. बाळापुर तालुक्यातल्या तामशी गावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला शेतातला कांदा पाण्याने भिजला गेला. जवळपास हजारो क्विंटल कांद्याचे नुकसान यात होणार आहे.
वाऱ्यामुळे केळी आडवी
पावसासोबत असलेल्या वाऱ्यामुले केळी झाडे पडल्याने केळीचे घड देखील मोडून पडले आहेत. जवळपास एकरी ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांच नुकसान झाले आहे. अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यावर आली होती. मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांकडे ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. यामुळे आता नुकसान सहन करावे लागत आहे. अमोल काळे यांच्या शेतातील जवळपास साडेचार एकर पैकी दीड एकर केळीचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.