Ajit Pawar in Assembl
Ajit Pawar in Assembl saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत संतापले

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar in Assembly : राज्यात दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून भेसळ करणाऱ्यांचं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची तरतूद करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची तरतूद करावी अशी मागणी विरोधी पत्रनेते अजित पवार यांनी केली 'आहे.

'पावडर एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी'

ते म्हणाले, दूध भेसळ करुन लहानग्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. (Latest Marathi News)

परंतु राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही. मात्र दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी. याशिवाय दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन ती एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील - पवार

अजित पवार यांनी शेतकऱ्यांबाबात राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. पीकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्याला यलो ॲलर्ट दिला आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत.

राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्यानं तिहेरी संकटात सापडला आहे.

'कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताहेत'

आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून २० मार्चपासून संपूर्ण राज्याला यलो अलर्ट तर ११ जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट मिळाला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीनं शेतीचं फार नुकसान झालेलं नाही’ अशी वक्तव्यं करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT