Ajit Pawar in Assembl saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत संतापले

Maharashtra News: अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar in Assembly : राज्यात दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला असून भेसळ करणाऱ्यांचं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची तरतूद करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीची तरतूद करावी अशी मागणी विरोधी पत्रनेते अजित पवार यांनी केली 'आहे.

'पावडर एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी'

ते म्हणाले, दूध भेसळ करुन लहानग्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. (Latest Marathi News)

परंतु राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही. मात्र दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी. याशिवाय दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन ती एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी.

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील - पवार

अजित पवार यांनी शेतकऱ्यांबाबात राज्य सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. पीकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान खात्यानं राज्याला यलो ॲलर्ट दिला आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे. अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत.

राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्यानं तिहेरी संकटात सापडला आहे.

'कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताहेत'

आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून २० मार्चपासून संपूर्ण राज्याला यलो अलर्ट तर ११ जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट मिळाला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीनं शेतीचं फार नुकसान झालेलं नाही’ अशी वक्तव्यं करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

SCROLL FOR NEXT