अहिल्यानगरच्या केडगाव परिसरात एका महाविद्यालयीन युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट असून नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत कोतवाली पोलिसांकडून तपास सुरू केला जात आहे.
तीन ते चार कुटुंबातील सात जण हे देव दर्शनासाठी जात असताना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत चहा पिण्यासाठी थांबलेल्या या भाविकांना दोन जणांनी लुटून गळ्याला कोयता लावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या आरोपींचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी करण्यात आली आहेत.
हवामान विभागाने आज पुण्यात घाटमाथ्यावर वादळी पावसाचा रेड अलर्ट दिलाय. तळ कोकणासह किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट दिले आहेत.
एनटीएने अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली. निकाल ४ जुलै २०२५ रोजी जाहीर होईल असे सांगण्यात आलंय. या दिवशी, विद्यार्थी CUET exam.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल तपासू शकतील.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली. नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप केले. तसेच या पंढरीला जाणाऱ्या भक्तांचे आशीर्वाद घेत त्यांना पंढरपूरच्या यात्रे करता शुभेच्छा दिल्या
नाशिकच्या येवला तालुक्यतील रेल्वेच्या अनकुटे येथील पूर्व भागातील ग्रामस्थांना वारंवार खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. हा विद्युत पुरवठा नगरसुल येथून होतो. अनकुटे हे त्या फिडरवरून शेवरचे गाव असल्याने पावसाळ्यात तेथून तासभर सुद्धा वीज मिळत नाही त्यामुळे नगरसुल येथील फिडरवरून सप्लाय काढण्यात येऊन तो तंदुळवाडीला जोडण्यात यावा या मागणीसाठी या परिसरातील शेतकरी,ग्रामस्थ यांनी येवला येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्यानंतर आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
अधून मधून रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे.
वांद्रेहून बोरिवली कडे जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
रुग्णवाहिका देखील वाहतूक कोंडीत अडकली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील फये गावात भूस्खलनाचा धोका
गावातील जमिनींमध्ये पडली भली मोठी भेग
जमिनीसोबत या परिसरात असणाऱ्या घराच्या भिंतीला देखील पडली भेग
जमिनीला भेग पडल्याने नागरिकांमध्ये घबराहाट
जिल्हा प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांनी केली पाहणी
दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारपासून धरणाच्या चारही दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासून
तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर असून ही पातळी ओलांडल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नांदेडमध्ये सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीकविमा भरल्याचा प्रकार उघड झाला. गत वर्षात तब्बल 4453 शेतकऱ्यांच्या नावावर शासकीय जमिनीवर पीकविमा भरण्यात आला होता. कृषी विभागाच्या तपासणीत पिकविम्याचे पैसे उकळण्यासाठी चाळीस सेतू सुविधा केंद्र चालकांनी हा प्रकार केल्याचे उघड झालय. या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून 40 सुविधा केंद्र चालकाविरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरुवातीला बीड जिल्ह्यात असाच पीकविमा घोटाळा उघडकीस आला होता.आता नांदेडमध्ये देखील असाच प्रकार उघड झालाय.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या स्व. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी आग्रहाची मागणी विधिमंडळाच्या माध्यमातून आज या भागाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी शासनाकडे केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पंकज देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली.
मनी लाँड्रिंग प्रकरणात मोहाली कोर्टानं विक्रम मजीठिया यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये एका लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतातील बजौर जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाला. या घटनेत असिस्टंट कमिश्नरसह पाच जणांचा मृत्यू झाला. तर इतर ११ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या डॉन न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
ही कोसळलेली दरड महामार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प
मार्गावर दरड आल्याने काही गावांचा संपर्क तुटला.
संबंधित प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर
जवळपास चार तास या मार्गावरची वाहतूक ठप्प
जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे घाटात दरड कोसळली.
काल राज्याचे जलसंधारण व मृद तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या बदल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ हिने बीडच्या कार्यकर्या सोबत फोनवर बोलतांना अश्लील आणि अपमानजनक भाषा वापरल्याची ऑडिट क्लिप व्हायरल झाली.त्यामुळे मंत्री राठोड समर्थकांच्या भावाना दुखावल्याने पौळ विरोधात यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पौळ विरोधात गुन्हा दाखल नेर केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदेगटच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशाली मासाळ यांनी दिला आहे.
कोल्हापूरचे माजी जिल्हाप्रमुख आणि उपनेते संजय पवार यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे यांना पदाधिकारी नेमताना काही चुका झाल्याचे लक्षात आणून दिले असून त्यांनी वेट अँड वॉच चा सल्ला दिला आहे.
कर्नाक पूल सुरू करण्यासाठी मुंबईत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्तपणे आंदोलन पुकारले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पुण्यात अल्पवयीन मुलांमध्ये जुन्या वादातून जबर मारहाण
कात्रज परिसरात काल रात्री अल्पवयीन मूल आपापसात भिडली
जुन्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
दोन वेगवेगळ्या गटातील अल्पवयीन मुले टू व्हीलरवरून जात असताना, दुसऱ्या बाजूने आलेल्या मुलांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली. हा वाद आधीपासून सुरू असल्याची माहिती समोर
भारती विद्यापीठ पोलिसांनी सगळ्या अल्पवयीन आरोपींना घेतल ताब्यात
मारहाणीचा CCTV व्हायरल
० रायगडमध्ये पावसाचा जोर वाढतोय
० अधुनमधुन कोसळत आहे जोरदार पाऊस
० हवामान खात्याने रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे
० काही काळ उसंत घेत, ढग दाटून येत कोसळत आहेत पावसाच्या जोरदार सरी
० परिस्थिती सामान्य
कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत पोलिसांनी हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल फोन शोधून काढत नागरिकांना परत केले आहेत. ७२ मोबाईल, एकूण सुमारे १२ लाख रुपये किंमतीचे फोन आज तक्रारदारांच्या हाती देण्यात आले. नागरिकांनी या कामगिरीसाठी पोलीस दलाचे आभार मानले असून, डीसीपी अतुल झेंडे यांच्या हस्ते मोबाईलचे वाटप करण्यात आले.
धाराशिवमध्ये शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रस्ता रोको करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यावर गुन्हे दाखल
महामार्ग अडवला आणि जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून शेतकऱ्यांवर केले गुन्हे दाखल
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी केला होता रास्ता रोको
एक तासापेक्षा जास्त काळ रस्ता अडवल्यामुळे धाराशिव मधील आंदोलनकर्त्यांवर धाराशिव पोलिसांकडून गुन्हे दाखल
- घाटकोपर मधील गावदेवी मंदिर जवळ एका घरामध्ये सिलेंडर ब्लास्ट
- घाटकोपर गावदेवी रामदास बाबा चाळ मध्ये सिलेंडर ब्लास्ट होऊन एका व्यक्ती गंभीर जखमी जखमीला जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल
- घटनास्थळी मुंबई अग्निशमन आणि मुंबई पोलीस दाखल
दापोली शहरातील कोळंबा आळी परिसरात एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणावर मैला वाहून पंचायत समिती परिसरातील घरांपर्यंत पोहोचला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील तामसवाडी फाटा जवळ ऑटो पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातामध्ये ऑटो मध्ये प्रवास करत असलेले दहा प्रवासी ते जखमी झाली असून यातील तीन प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे. अपघात ग्रस्त हे अंजनगाव तालुक्यातील गोंडवाघोली येथील रहिवाशी आहेत.
सतत पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील फये गावात भूस्खलनाचा धोका
गावातील जमिनींमध्ये पडली भली मोठी भेग
जमिनीसोबत या परिसरात असणाऱ्या घराच्या भिंतीला देखील पडली भेग
जमिनीला भेग पडल्याने नागरिकांमध्ये घबराहाट
जिल्हा प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन अधिकाऱ्यांनी केली पाहणी
यंदाच्या आषाढी वारीत प्रथमच प्रशासनाच्या वतीने पंढरपुरात येणार्या भाविकांना शुद्ध बाटली बंद पिण्याचे पाणी आणि शक्ती वर्धक ज्युसचे वाटप करण्यात येणार आहे. तीन दिवस सुमारे 15 लाख भाविकांना पाणी आणि ज्युसचे वाटप करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या वतीने भक्ती सागर,वाखरी पालखी तळ, चंद्रभागा वाळवंट आदी परिसरात वापरकर्त्यांसाठी स्वच्छता गृह आणि शौचालयांची सोय करण्यात आली आहे. निर्मल आणि स्वच्छ वारीसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. सरकारकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. सरकार चर्चेपासून पळ काढणार नाही, हे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतंच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांना त्यांच्या उद्याच्या ठरावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी आहे.अजित पवार, उपमुख्यमंत्री
नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्य हद्दीत २७ जुनच्या पहाटे एका पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात केल्यानं भीतीच वातावरण निर्माण झालं. सुदैवाने, सतर्क आजीच्या उपस्थितीमुळे आरोपीचा हा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र 55 सीसीटीव्ही शोध घेत श्रवणकुमार शिवराम यादव असे अटक आरोपीचे नाव आहे.नरेश कळसेकर, नागपूर पोलीस निरीक्षक
शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करीत विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात गोंधळ न घालण्याचे आवाहन केले.
- संत मुक्ताबाई यांची पालखी माढ्यावरून निघाली,आज मोहोळ तालुक्यातील आष्टीला असणार मुक्कामी
-
- संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची पालखी गेल्या 28 दिवसापासून मुक्ताईनगर ते पांडुरंगाच्या वारीसाठी करत आहे प्रवास
- विठुरायाच्या नामघोषात हजारो वारकरी मुक्ताईच्या दिंडीत झाले आहेत सहभागी
- उद्या आष्टी मधून पंढरपूरच्या दिशेने संत मुक्ताबाईंची पालखी करणार प्रस्थान
- आषाढी एकादशीच्या सोहळ्या दिवशी विठुरायाच्या भेटीसाठी मुक्ताई पालखीचा प्रवास
पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत पुण्यातील घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.
अंबरनाथमध्ये मनसैनिकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेले टी-शर्ट छापले आहेत. ५ जुलै रोजीच्या मोर्चात मनसैनिक हे टी-शर्ट घालून सहभागी होणार होते, मात्र आता दोन्ही पक्षांच्या विजय मेळाव्यात मनसैनिक हे टी-शर्ट घालून सहभागी होणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पवार यांनी वरिष्ठांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उपनेतेपदाचा दिला होता राजीनामा
त्यानंतर संजय पवार यांना शिंदे गटाकडून खुली ऑफरही देण्यात आली होती.
मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर संजय पवार यांची नाराजी झाली दूर
आज बुधवारी दुपारी दीड वाजता संजय पवार हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार आहेत.
रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढलेली असतांना देखील काही अतिउत्साही तरुणांकडून पुराच्या पाण्यामध्ये हुल्लडबाजी करण्याचे प्रकार सुरू आहेत. या ठिकाणी नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक गायब असल्यानं हुल्लडबाजांवर कुणाचही नियंत्रण नसल्याचं पाहायला मिळतंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आला असून सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे तर जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 40.56 मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक सावंतवाडी तालुक्यात 70 मिमी पाऊस झाला आहे.
उल्हासनगरमधील रिजेन्सी वाणिज्य ग्रहसंकुलात असलेल्या स्काय डोम या हॉल मधील वाढीव बांधकामावर आज महापालिकेने तोडक कारवाई केली , या गृह संकुलात तब्बल ३ हजार चौरस मीटर अनधिकृत बांधकाम करून
त्यावर भाडे आकारले जात होते,याविषयी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी तक्रार केली होती,
ज्ञानोबा तुकाराम च्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे खुडूस फाटा येथे गोल रिंगण पार पडले.यावेळी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी हजेरी लावली.रिंगणाचा आनंद लुटला.संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा आजचा मुक्काम वेळापूर या ठिकाणी असणार आहे.त्याअगोदर सकाळी खुडूस फाटा येथे गोल रिंगण पार पडले.रिंगणाच्या ठिकाणी दिंड्या सहभागी होऊन हरिनामाचा गजर करत रिंगणात सहभागी झाले.
संतोष देशमुख खून प्रकरणाला 204 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप पर्यंत या खून प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. त्याला तात्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी आज जाहीर केलंय. तर आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे पक्ष चिन्ह असलेल्या गाड्या सुनावणी दिवशी कोर्टात मोठ्या संख्येने आणून वातावरण भयभीत करून कुटुंबावर दबाव आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असल्याचाही धनंजय देशमुख यांनी आरोप केला आहे.
- मात्र 6 जुलै नंतर पावसाचा जोर वाढणार आणि चांगल्या आणि वादळी पावसाला होणार सुरवात
- जुलै महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज
- 6 जुलै च्या आसपास बंगाल च्या खाडीत एक सिस्टम बनण्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव विदर्भावर होऊन चांगला पाऊस होणार ...
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून शहरात मात्र पावसाची उघड झाप आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीचे पाणी आठवड्यात दुसऱ्यांदा पात्र बाहेर पडले आहे. पंचगंगा नदी क्षेत्रात असणाऱ्या 33 बंधाऱ्यांवर पाणी असल्यामुळे इथली वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची संततधार असल्यामुळे धरण क्षेत्रात देखील वाढ होताना दिसत आहे. राधानगरी धरण सध्या 66 टक्के भरले आहे.
इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, चाकण, येथील अॅल्युमिनियम डाय कास्टिंग आणि मशीनिंग (उत्पादन) सुविधा केंद्रात काम करण्यासाठी १०० पेक्षा अधिक माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. माजी सैनिकांची नियुक्ती प्लांटमध्ये ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग, गेट कटिंग, ऑटोमेशन कंपोनेंट्सच्या फेटिंग मशीन शॉपसारख्या कामांमध्ये करण्यात येईल. ३० ते ४५ वर्षे वयाची अट असून, इयत्ता १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.
शासनाकडून यंदा सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं दिल्याचा दावा केला जात असताना वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत मात्र इयत्ता चवथीच्या विध्यार्थ्यांना पटसंखे पेक्षा कमी पुस्तकं मिळाले असून पुस्तकांचा एक संच दोन विद्यार्थ्यात वाटून दिला जात असल्याची तक्रार पालकांनी केलीये.
- मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान
- तर बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात
- उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हवालदिल
- कांद्याला ५०० रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
- चालू पावसाळी अधिवेशनात कांद्याला ५०० रुपये अनुदान जाहीर करण्याची कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
नवीन बायपास महामार्गावर कोरंभीजवळ रात्री भीषण अपघात घडला, भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. त्यात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सोनू केरु पालवे (२३) रा. गिरोला व मृणाल अशोक मानवटकर (२५) रा. जाखेगाव ता. मौदा, असे मृतकांची नावे आहेत.घटनेच्यावेळी नवीन बायपास महामार्गावर कोरंभी गावाजवळ ट्रक उभा होता. परिसरात काम केले जात होते. त्यामुळे महामार्गाच्या काही लेनवर बेरिकेट्स आढवे लावण्यात आले होते. रात्रीच्या दरम्यान मृतक हे दुचाकीने भरधाव जात असतांना बॅरिकेट्स पाळून उभ्या ट्रकला मागून जबर धडक दिली. दुचाकी अक्षरश ट्रकच्या चाकातच शिरली.दुचाकीवरील दोघेही जण या अपघातात जागीच मृत पावले.
मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला.. यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा या तिन्ही धरणांत नवीन पाण्याची आवकही वाढली असून भंडारदरा 60 टक्के, तर निळवंडे धरण 50 टक्के भरले आहे.. कळसूबाई शिखराच्या पर्वत रांगातही पावसाचा जोर वाढला असल्याने प्रवरेची उपनदी म्हणून समजल्या जाणाऱ्या कृष्णावंती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
जळगाव जून संपला असतानाही काही भागात दमदार पावसाअभावी बळीराजा चिंतेत बुडाला आहे. तर दुसरीकडे पाणीटंचाई कमी होण्याचे नाव घेत नाही. सरलेल्या जून महिन्यातही २० गावांमध्ये २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. या टँकरची संख्या जामनेर, चाळीसगाव व अमळनेर तालुक्यात सर्वाधिक होती.
ग्रामीण भागामध्ये डिसेंबर २०२४ पासूनच पाणीटंचाई सुरू झाली आहे. ती आजही कायम आहे. यावेळी जूनमध्ये सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र मान्सूनची वाटचाल उशिराने झाली. त्यामुळे जूनच्या शेवटच्या काळातही पाणीटंचाई निर्माण झाली
मागच्या दोन आठवड्यापासून लातूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र,रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझिम सुरू झाली आहे., तर कवळ्या पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळालीय. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाच वातावरण पाहायला मिळत आहे. तर पुढील काही तास हवामान विभागाने लातूर जिल्हाला पावसाचा इशारा देखील दिला आहे.
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात राणेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. राणेंनी मर्डर केल्या, भानगडी केल्या, माऱ्यामाऱ्या केल्या. त्यामुळेच ते एवढ्या उंचीवर पोचले असे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. गोगावले यांचे हे वक्तव्य म्हणजे कार्यकर्त्यांना गुन्हे करण्यासाठी चिथावणी देणारे आहे. समाजात यातून चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली. तसेच राणेंनी केलेल्या गुन्ह्याची गोगावलेंकडे माहीती आहे ती त्यांनी पोलीसांना द्यावी अशी मागणी ही इर्शाद शेख यांनी केली आहे.
सांगलीच्या चांदोली परिसरातील वारणावती वसाहत वन्य प्राण्यांचं आश्रयस्थान बनू लागली आहे. वारणा प्रकल्प कर्मचाऱ्यांच्या साठी बांधलेली ही वसाहत सध्या अखेरची घटका मोजू लागली आहे. जीर्ण अवस्थेत झालेल्या मोकळ्या आणि पडक्या खोल्या. अवतीभवती वाढलेलं झाडाझुडपांचं साम्राज्य यामुळे गवे, बिबटे यांचे येथे वारंवार दर्शन होत आहे . यातच आता अजगराची भर पडली आहे. गेल्या वर्षभरापासून वारंवार या वसाहतीत अजगराचं दर्शन होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मणदूर मुक्कामी येणाऱ्या शिराळा मणदूर या बस समोरच परवा रात्री सव्वा नऊच्या सुमारास वारणावती येथे भला मोठा अजगर आला. चालकाने तात्काळ बस थांबून त्याचे चित्रीकरण केलं. संथ गतीने तो वारणा प्रकल्प कार्यालय परिसरातील झाडाझुडपात निघून गेला.
आरोपी वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृह ऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांनी केली होती. बीडच्या जिल्हा कारागृहात गीते गॅंग आणि कराड गॅंग मध्ये झाला होता वाद.
प्रेमविवाहाला नकार दिल्याने प्रेयसीला संपविण्यासाठी थेट बिहारमधून पिस्तूल विकत आणणाऱ्या प्रियकराला मूल पोलिसांनी अटक केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे समोर आली. आरोपीकडून दोन जिवंत काडतुसे व एक देशी बनावटीच्या पिस्तूलसह १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गौरव नितीन नरुले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर तोही आत्महत्या करणार होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शंभर गाड्या कांद्याचे आवक होत आहे.शासनाने निर्यात शुल्क देखील हटवल, कांद्याची आवक देखील कमी असून कांद्याला योग्य दर मिळत नाही.सध्या कांद्याला सरासरी 1500 - 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.तर चांगल्या कांद्याला 2100 रुपये हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे.
लाखो वारकरी भाविक आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अनेक भाविक, वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. उर्वरित भाविक, वारकरी हे एसटी, रेल्वेने जातात. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी विभागानेही गाड्यांचे नियोजन केले आहे. आत्तापर्यंत 23 एसटी गाड्यांचे आरक्षण झाले आहे. 3 जूनला रत्नागिरी सह विविध आघातून एसटी बस पंढरपूरला रवाना होणार आहेत. अजून काही दिवस असल्याने भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे असे आवाहन एसटी विभागाच्या वतीने केले आहे.
सुट्टीचा आणि पर्यटनाचा हंगाम असूनही भारमान नसल्याने मंडणगड एसटी आगार मे महिन्यात 14 लाखांनी तोट्यात गेला आहे. ग्रामीण भागात 50 टक्केच भारमान मिळत असून वाहतुकीचा खर्च अधिक झाला आहे. परिणामी मंडणगड एसटी आगाराचे चाक कमी भारमानाच्या चिखलात रुतत आहे. मंडणगड आगारातून 48 एसटी बसच्या 197 फेऱ्या होतात। मे महिन्यात 14 हजार 500 किमी प्रतिदिन प्रवास होतो. मात्र सवलत मूल्यांसह 38% च भारमान राहिले आहे. प्रति किलोमीटर खर्च 57 रुपये अपेक्षित असल्यामुळे आगाराला तोटा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात इंधन आणि कर्मचारी असा 38 रुपये प्रति दिन खर्च होत असताना, तो 19 रुपये प्रति किमी भारमान राहत आहे. परिणमी आगार हे कमी भारमानामुळे तोट्यात येत आहे.
बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाले असून शाळेत मुले एकमेकांच्या सहवासात आल्याने सर्दी खोकला ताप जुलाब व अतिसाराच्या समस्या वाढल्या आहेत
प्रामुख्याने दोन ते दहा वयोगटातील मुलांमध्ये हे संसर्गाचे प्रमाण वाढले असून हे आजार जरी सामान्य असले तरी ते सहज पसरतात आणि लवकरात लवकर उपचार न केल्यास त्याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते यासाठी बालकांची काळजी घ्यावी असे आवाहन बालरोग तज्ञांनी केले आहे
ईव्हीएम मशीनच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनात.. ओबीसी आधारित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.. बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.. या प्रमुख मागण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा ,राष्ट्रीय पिछडा वर्ग, बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात भारत बंदचे आव्हान करण्यात आले होते, बुलढाण्यात देखील भारत मुक्ती मोर्चा आणि इतर सामाजिक संघटनेच्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे निदर्शने करण्यात आली, तर बुलढाणा बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.. यावेळी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे शुक्रवारी (४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
प्रबोधिनीमध्ये सकाळी पावणेअकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, प्रबोधिनीचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह उपस्थित राहणार आहेत.
हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेतही कमी पाऊस बरसला आहे.मात्र जुलै महिन्यात मुबलक पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे महिन्याभरात आणखीन पाऊस नोंदवला जाणार आहे. तूर्त पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे.मात्र पावसाची उसंत मिळत असल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांकडून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर स्पेशल यात्रा बसेस सोडल्या जाणार आहे.विठुरायाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री यांच्याकडून तीन दिवस चहा, नाश्ता आणि भोजन मोफत दिले जाणार आहे. यवतमाळ विभागातील 725 अधिकारी कर्मचारी पंधरा दिवस या सेवेत राहणार आहे. विशेष म्हणजे यवतमाळ आगारातून पंढरपूरसाठी 250 बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2025-26 साठी राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी 31 जुलै 2025 पर्यंत विमा काढता येणार आहेत. तर पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ही पीक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलाय, दरम्यान या हंगामातील वेगवेगळ्या पिकांसाठी देण्यात येणारी विमा संरक्षित रक्कम देखील घोषित करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे असा आरोप या पालकांनी केला आहे. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा केला परंतु अद्याप कारवाई झालेली नाही आता पोलीस अधीक्षकाने आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या पायऱ्यांची अतिशय दूरवस्था झालीय. त्या अतिशय धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होतीय. या स्कायवॉकच्या अनेक पायऱ्यांवरील लाद्या तुटलेल्या आहेत. पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचत असल्यानं प्रवाशांना पायऱ्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे पाय घसरून अपघात होतायेत. त्यामुळे नगरपालिकेनं लवकरात लवकर या पायऱ्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केलीय.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार्या शासकीय महापूजेचे मंत्र पठण व देवाचे उपचार करण्याचा मान मंदिरातील 11 पुजार्यांना मिळाला आहे. महापूजेच्या निमित्ताने पूजार्यांनी मंत्रोच्चाराचा सराव सुरू केला आहे. मंदिरातील मुख्य पुजारी संदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व 11 पुजारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या महापूजेचे पौराहित्य करणार आहेत. महापूजेवेळी सोवळे आणि उपरणे असा पोषाख परिधान करून हे सर्व पूजारी महापूजेच्या वेळी मंत्रोच्चार करणार आहेत.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महावितरणच्या बदलापूर ग्रामीण विभागावर प्रचंड ताण येतोय. लाखभर लोकसंख्येसाठी अवघे 9 कर्मचारी अशी स्थिती आहे. त्यामुळे वीज वितरणाचा गाडा कसा हाकायचा हाच प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर पडलाय.
पंढरपूर येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे मुळ रूप देण्यात आले आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणार्या भाविकांना विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे बदलेले रूपडे पाहायला मिळणार आहे.
राज्य सरकारने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन करण्यासाठी 73 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्यामधून हे काम सुरू आहे. विठ्ठल रूक्मिणी मातेचा गाभारा, चौखांबी,सोळखांबी,सभा मंडप आदी भागातील कामे पूर्ण झाली आहेत. या भागात नव्यानं विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत.
दिव्यांच्या प्रकाशामुळे मंदिरात प्रसन्नता वाढली आहे. मंदिरातील खांबावरील कोरीव मूर्ती,आणि नक्षी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे मंदिराचे आयुष्य वाढण्यास मदत झाली आहे.
राज्यात बळीराजापुढं बनावट बियाण्यांचं संकट उभ ठाकलंय.. खरीप हंगामात बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याची मोठी फसवणूक होतं असल्याचे प्रकार समोर येत आहे.. अकोल्यातही बनावट बियाण्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक झालीय.. अकोल्यातल्या पातूर तालुक्यातल्या अंबाशी येथे एका शेतकरी दांपत्यावर दुबार पेरणीच संकट ओढावलं आहे.. नंदकुमार आणि संगीता लाहोळे या शेतकरी दांपत्यानं 10 एकरात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली.. यासाठी त्यांनी अकोल्याच्या एका कृषी सेवा केंद्रावरून सोयाबीन आणि तुरीची बियाणं आणलं होत.. 21 जूनला शेतात पेरणी आटोपून गेली.. अनेक दिवस उलटले, पाऊस देखील चांगला झाला. मात्र, त्यांच्या शेतातलं बियाणं काही उगवल नाही..
वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील स्थानिक शिरोडकर कुटुंबियांना जमीनीच्या वादातून मारहाण करण्यात आली आहे. जमीनीचा जबरदस्ती ताबा घेण्यासाठी गुजरात अहमदाबाद येथील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर नामक व्यक्तीने परप्रांतीय महिलांना आणून स्थानिक महीलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून समाज माध्यमांसमोर आणला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.