आझाद मैदान येथे होणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून सुमारे 5000 शिवसैनिक जाणार आहेत. तर जिल्हाभरातूनही शिवसैनिक उस्फूर्त पणे दसरा मेळाव्यासाठी रवाना होतील असा दावा शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. यावर्षीचा दसरा मेळावा आगळावेगळा होणार असून आगामी जिल्हापरिषद व महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहात दसरा मेळाव्यासाठी दाखल होतील अशी माहीती ही संजू परब यांनी सावंतवाडी येथील दीपक केसरकर यांच्या शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
- नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्यानं गोदावरीचा पूर ओसरला
- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात गोदावरीची पाणीपातळी घटली
- गंगापूर सद्यस्थितीत सुरूय १४४२ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- रामकुंड, गोदाघाट परिसरातील जवजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशी पिकावर मोठा परिणाम झाला आहे,कपाशीचे शेकडो एकर क्षेत्र पावसाच्या पाण्यात बुडाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने झाडांची वाढ खुंटली असून, कापसाच्या बोंडांवर कुज येण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभी केलेली पिके अक्षरशः डोळ्यांसमोर नष्ट होताना दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. आधीच सोयाबीन पिकाला आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा सहन केलेल्या शेतकऱ्यांना कपाशीतील नुकसानामुळे दुहेरी फटका बसला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पन्नाचे गणित कोलमडले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणार नाही.
जालन्यातील भोकरदन शहरात एक दिवसीय नवरात्र गरबा उत्सवाच आयोजन करण्यात आल होत. जालन्यातील भोकरदन शहरात सकाळ माध्यम समूह आणि समृद्धी गार्डनच्या पुढाकाराने गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गरबा कार्यक्रमात नृत्यासोबतच, लाइव्ह डीजे गरबा, आकर्षक बक्षिसे, फूड स्टॉल्स, संगीत आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम लहान मुलांसाठी स्वतंत्र मनोरंजन व्यवस्था करण्यात आली होती.महाविद्यालयीन तरुणी तसेच शहरातील महिलांनी या कार्यक्रमाचा पारंपारिक गरबा पोशाखामध्ये सहभाग नोंदवला.
मावळच्या दिवड येथील श्रीसंत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील एकवीस सावित्रीच्या लेकींना नवरात्र उत्सवात सायकलींचे वाटप करून गौरविण्यात आले आहे.. नवरात्र उत्सवात कुमारिका पूजन मोठ्या प्रमाणात केले जाते.
हाच धागा धरून युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले.. मावळ तालुक्याचं शेवटच टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय ग्रामीण भागातील गाव म्हणजे दिवड. या गावात संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय असून पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेत सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अतिशय ग्रामीण भाग असल्यामुळे युनियन बँकेच्या ही बाब लक्षात आली त्यांनी आठवी आणि दहावी मध्ये शिकणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्याचं निर्णय घेतला... दरम्यान सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंद बघायला मिळालं. रोज पाच ते सहा किलोमीटर पायपीट करत शाळेत आम्ही जात होतो. मात्र सायकल मिळाल्यामुळे येण्या-जाण्याचा प्रश्न सुटला असून वेळ वाचणार आहे. आम्ही तो वेळ अभ्यास करण्या करिता आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंद झालेला आहे... या कार्यक्रमाला युनियन बँकेचे व्यवस्थापक, ग्रामस्थ, शिक्षक, यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते..
शेतकरी संकटात असताना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा
कळंब तालुक्यातील संचितपुर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतीच मोठ नुकसान झालेलं असताना बँकांकडून वसुली सुरूच
संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्याने शेतकरी संकटात
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संचितपुर गावातील शेतकऱ्यांची मागणी
राज्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असल्यामुळे राज्यातला शेतकरी अडचणी सापडला आहे या निमित्ताने नवी मुंबई युवा सेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईच्या युवा सेनेच्या माध्यमातून 50 पाच हजार रुपयांची ओला दुष्काळासाठी निधी सपूर्त केला आहे
भीमा आणि नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून सोमवारी दुपार पासून भीमानदी पात्रात तब्बल एक लाख 25 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी पंढरपुरात चंद्रभागा इशारा पातळीवरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.
मागील एक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु करावे यामागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरीतील येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्डयातील पाण्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु न केल्यास संबंधीत ठेकेदाराच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल , असा इशारा येथील माजी सरपंच प्रेम चव्हाण यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 3 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामाचे निविदाही पूर्ण झाली आहे. परंतु संबंधीत ठेकेदाराने मागील एक वर्षापासून काम सुरु केले नाही. रखडलेले काम ताडीने सुरु करावे यामागणीसाठी आज येथील आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यानीच रस्त्यावर पडलेल्या खड्यामधील पाण्यात बसून ठेकेदार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती, सूचना जाहीर घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना ६ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी १ जुलैपर्यतची मतदार यादी ग्राह्य धरणार आहे. पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करून त्यावर हरकती, सूचना मागविल्या होत्या. यावर २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या हरकती सूचना मागविल्या होत्या.
कीटकनाशक फवारणी विषबाधेने तरुणाचा मृत्यू... शेतातील पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने झाली होती विषबाधा. वडनेर गंगाई येथील या तरुण शेतकऱ्याचा. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 'गणेश ज्ञानेश्वर कात्रे' असं या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
नगर शहरात काल झालेल्या रास्तारोको नंतर दगडफेकीच्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...
जवळपास दोनशे जणांवर गुन्हा दाखल....
पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल...
रस्ता रोको दरम्यान जमावाने केलेल्या दगडफेकीत सात पोलिस कर्मचारी जखमी...
पोलिसांनी आत्ता पर्यंत घेतले 39 जणांना ताब्यात...
दरम्यान जमावाने तोडफोड आणि रिक्षांच्या काचा फोडल्याचा नवीन व्हिडिओ समोर...
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्राशेजारील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. जालन्यातील गोदाकाठच्या 26 गावातील जवळपास आठ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं.जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
गरबा चालवायचा असेल तर आम्हाला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत डेकोरेशन व्यावसायिकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणात वजीराबाद पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी या तिन्ही आरोपींची घटनास्थळी नेऊन धिंड काढली.नांदेड शहर आणि जिल्ह्यात सध्या नवरात्र महोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे अनेक ठिकाणी दांडिया, गरबा महोत्सव सुरू आहेत. याच महोत्सवादरम्यान शहरातील व्यंकटेशनगर येथे जय दुर्गामाता महोत्सवात 25 सप्टेंबर रोजी वैभव गुरव या डेकोरेशन व्यावसायिकास तुला गरबा चालवायचा असेल तर आम्हाला रोज दहा हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अन्यथा जिवे मारू अशी धमकी दिली.गुरव यांच्यावर तलवारीने वार देखील करण्यात आले.या प्रकारानंतर वजीराबाद पोलिसांनी या तीन आरोपींना अटक केली आणि त्यांची धिंड काढली.
चिमुकली मुलगी खाऊची पिशवी घेऊन घराकडे जात असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली. या हल्ल्यात मुलगी जखमी झाली. यावेळी चिमुकलीने आरडाओरड केल्याने पालकांनी तात्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले आणि मोठा अनर्थ टळला. मात्र गावात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
पोलिसांनी धाड टाकत केली पिडीत महिलांची सुटका
पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरातील मसाज पार्लर वर पोलिसांचा छापा
खराडी भागातील SUN SHINE SPA वर पोलिसांनी केली कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांना मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा चालक, व्यवस्थापक यांचा वर गुन्हा दाखल केला
पुणे मुंबईसह मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर होणार आजपासून कमी
२७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता
३० सप्टेंबर नंतर पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे
राज्यातील जिल्ह्यांना आज कुठल्याही प्रकारचा "अलर्ट" नाही
काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी अपेक्षित
पुणे शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर झाला कमी
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर सुद्धा पाऊस थांबला
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा पावसाची विश्रांती
समाधानकारक पाऊस झाल्याने पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर मध्ये १०० टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील ४ ही धरणे मिळून २९ टी एम सी पाणीसाठा
कोयना परिसराला भुंकपाचा धक्का
रात्री 12 वाजून 9 मिनिटांनी बसला सौम्यधक्का
3.4 रिश्टर स्केलचा सेमी धक्का
कोयनानगरपासून चार किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू
भूंकपाच्या धक्क्यामुळे कोणतीही हानी नाही
खडकपूर्णा प्रकल्प 100 टक्के भरला असल्याने धरणाचे 19 दरवाजे उघडले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीला पूर आला आहे.. अश्यातच नदी पात्राच्या काठावर असलेल्या बांबूच्या झाडावर 15 ते 20 माकडे बसलेली होती अचानक नदीला पूर आला व ते सर्व माकडे पाण्यात पडली.. आणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने शेवटी माकडे वाहून गेलीत......
कडुस कोहिंडे रोडवर दोन एसटी बसचा समोरासमोर धडकीचा अपघाताचा थरार प्रवाशांसह महाविद्यालयील विद्यार्थ्यांनी अनुभवला यावेळी एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बाजुला घेतल्याने मोठ्या अपघाताचा प्रसंग टळला यावेळी दोन एसटी बस ग्रामीण भागातील रस्त्यावर धावताना भरधाव वेगाने धावत होत्या यावेळी एकमेकांना कट मारण्याच्या नादात हा भिषण अपघात झाला यावेळी प्रवाशांनी अपघाताचा थरार डोळ्यासमोर अनुभवल्याने आता एसटी बसचा प्रवासही सुखरुप नसल्याची भावना व्यक्त केलीय
मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने यंदा श्रीक्षेत्र नारायण गडावरील मनोज जरांगे पाटील यांचा होणारा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे साधा पद्धतीने असणार आहे. या मेळाव्याची तयारी नारायण गडावर पूर्ण होतेय.. मागील वर्षी नारायण गडावर भव्य स्वरूपात मेळावा झाला.. मात्र सध्या शेतकरी अडचणीत असल्याने हा मेळावा साध्या पद्धतीने होईल आणि नारायणगड स्वतः हा दसरा मेळावा घेत आहे. तर पूरग्रस्तांना देखील मदत केली जाणार आहे..
राज्यामध्ये पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालाय त्यामुळे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना 27 लाख 11 हजार रुपयांचा निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या नावे देण्यात आलाय. यावेळी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वीर शहीद जवान पत्नी सुनीता प्रकाश हिरे यांना मुख्यमंत्र्यांनी जमिनीचा पट्टा वाटप सुपूर्द केला
धाराशिव जिल्ह्यातील काजळा गावात मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आल्यामूळे शेतकऱ्याच्या दुपत्या गायी वाहून गेल्याने पशुधनाचे नुकसान झालय.काजळा आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासह इतर पिकांचे ही मोठं नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून तर शिवारातील लहान मोठे रस्ते ही वाहून गेल्याने शेती पुन्हा कशी पूर्ववत करायची हा शेतकऱ्यापुढे प्रश्न उभा टाकलाय. पुलाची उंची कमी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता गावकऱ्यांमधून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.