धाराशिवच्या भुम नगर परिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांच्या जीविताला नगरसेवकापासूनच धोका असल्याचं पत्र धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ.कीर्ती किरण पुजार यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना दिल्याने धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहून आपत्कालीन नियोजन पूर्ण ठेवण्याचे निर्देश
- संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखण्याच्या सूचना
- पूर नियंत्रण कक्षाला धरणांतील पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून वेळेवर नियोजन करण्याचे आदेश
- कमी उंचीच्या पूलांवर पाणी वाढल्यास तातडीने वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे निर्देश
- शहर आणि ग्रामीण भागातील नाले, सांडपाणी वाहिन्यांतील प्लास्टिक तसच अन्य अडथळे तातडीने हटवण्याचे आदेश
वाशिमच्या मालेगाव शहरातील संतोषी माता कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ४ लाख ७ हजार ४३६ रुपयांचा सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी समोर आलीये,मिश्रा कुटुंब रात्री घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला. घरातील दिवाणामधील लोखंडी पेटीत ठेवलेले ४४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार व कानातील जोड, ३९ ग्रॅम वजनाचा लांब पाठी हार, चार काळ्या मण्यांचे दागिने तसेच ४५ हजार रुपये रोख, असा एकूण ४ लाख ७ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
गडचिरोली जिल्ह्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली, चामोर्शी आणि सिरोंचा या तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगाव शहरा नजीक सुदर्शन हॉटेल शेजारी असलेल्या एका पडक्या घरात महामार्गावरून एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅसची चोरी करताना अन्न व पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने छापा टाकून टँकर मधून एलपीजी गॅसची चोरी होताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी राज्यदक्षता पथकाला या अशाप्रकारे गॅस चोरीच परिसरात मोठ रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून हा गॅस चोरीचा व काळ्या बाजाराचा अवैध धंदा अनेक वर्षांपासून सुरू होता.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासासाठी महिलांना एनसीएमसी (NCMC) कार्ड अनिवार्य होणार असल्याच्या चर्चेमुळे विठ्ठलवाडी एसटी आगारात महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. कार्ड नोंदणीसाठी केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने आगारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवस कार्ड तयार करणारी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना परत जावे लागल्याची तक्रार आहे. तसेच, नोंदणी प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होत असल्याने अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्ड नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाईल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी एसटी प्रशासनाने अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
सततच्या संतधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ
धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चिंता मिटली
खडकवासला १०० टक्के तर पानशेत ९८ टक्के भरले
गेल्या वर्षी आजच्या तारखेला एकूण पाणीसाठा ८८ टक्के होता मात्र यंदा तो ९४ टक्क्यांवर
खडकवासला: १०० टक्के
पानशेत: ९८.३८ टक्के
वरसगाव: ९३.४९ टक्के
टेमघर: ८१.६९ टक्के
एकूण पाणीसाठा: ९४.२२ टक्के
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.