Ahmednagar Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Assembly Election : नगरकर कुणाला कौल देणार, संग्राम जगताप पुन्हा आमदार होणार का? जाणून घ्या संपूर्ण गणित!

Rohini Gudaghe

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याकडे सहकाराचा बालेकिल्ला म्हणून पाहिलं जातं. मागील दोन पंचवार्षिकपासून अहमदनगर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता ठाकरे गट यंदाच्या निवडणुकीत बाजी मारणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे यंदाची पंचवार्षिक चांगलीच रंगणार असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचं मतांचं गणित काय असणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. नगरमध्ये यंदा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार, हे मात्र नक्की.

विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदनगरमध्ये कोणत्या पक्षाला पसंती दिली जाईल? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार सुजय विखे यांना निलेश लंकेंनी धूळ चारली. सुजय विखे यांचा पराभव हा राज्यात चर्चेचा विषय बनला होता. जिल्ह्यातील सध्याचे वातावरण पाहता मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या दिशेने जास्त असल्याचं सांगितलं (Ahmednagar Assembly Constituency Election) जातंय. परंतु विधानसभेत हे चित्र कसं असेल, हे सांगता येणार नाही. मतांचा खेळ बदलल्यास अजित पवार आपला गड राखण्यात यशस्वी देखील ठरू शकेल. मागील दोन वर्षात राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

सध्या काय चित्र ?

सध्या अहमदनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अजित पवार गटाचे संग्राम जगताप हे विद्यमान उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष जागेवर दावा करत असल्याचं समोर (Mahavikas Aghadi Vs Mahayuti)आलंय. त्यामुळे आता महाविकास आघाडी नेमकं कुणाला रिंगणात उतरवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल

अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके आणि भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. परंतु निलेश लंके यांनी २९,३१७ मताधिक्याने सुजय विखे-पाटील यांचा पराभव (Maharashtra Politics) केलाय. त्यामुळे सध्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर शरद पवार गटाची सत्ता आहे.

२०१९ चा विधानसभा निवडणूक निकाल

२०१९ मध्ये अहमदनगर विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम अरुण जगताप ८१,२१७ मतांनी विजयी झाले (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होते.अनिल रामकिसन राठोड यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. पक्षफुटीनंतर संग्राम जगताप अजित पवार गटात गेले. त्यामुळे सध्या अहमदनगर विधानसभेवर अजित पवार गटाचं म्हणजेच महायुतीचं वर्चस्व आहे.

२०१४ चा विधानसभा निवडणूक निकाल

अहमदनगरमध्ये विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजयाचा गुलाल उधळला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप ४९ हजार ३७८ मतांनी विजयी झाले होते. तर अनिल राठोड यांना पराभव पत्करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT