मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. शेतीसाठी दिवसा वीज मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. शेतकऱ्यांच्या या समस्येची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा वीज देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आता दिवसा १० तास वीज मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येथील आर्वी येथील एका कार्यक्रमात बोलताना विजेबाबत त्यांनी मोठी घोषणा केलीय.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्यात येणार आहे. तसेच विजेचे बिल कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. विजेचे बिल दर ५ वर्षांनी कमी करून दाखवणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिलं राज्य ठरलं असल्याचेही मुख्यमंत्री म्हणालेत. राज्यातील ८० टक्के भागात आता लवकरच दिवसा १० तास वीज उपलब्ध करून देण्यात येईल.
लोअर वर्धा प्रकल्पावर ५०० मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जातोय. वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. येथील नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली असून फडणवीसांनी येथील गावकऱ्यांचे अभिनंदन केलंय. वर्ध्यातील आमदार-खासदारांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत, त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिलेत.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाईल, असे आश्वसन निवडणुकीच्या वेळी देण्यात आले होते. त्याची पूर्तता महायुती सरकारकडून केली जात आहे. राज्यातील ८० टक्के भागात दिवसा १० तास वीज दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलीय.
विहीर पुनर्भरण योजना राबवण्यात येत आहे, त्याचा फायदा होणार असून त्यातून विहिरीतील पाण्याची पातळी वाढेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आलीय. शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.