कृषीमंत्री दादा भुसे यांचा पिक पाहणी दौरा भूषण अहिरे
महाराष्ट्र

कृषीमंत्री दादा भुसे यांचा पिक पाहणी दौरा

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोंडले या परिसरातील शेतीची पाहणी केली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोंडले या परिसरातील शेतीची पाहणी केली आहे. जून महिना संपल्यानंतर देखील अद्यापही धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस पाहिजे तितक्या प्रमाणात पडला नाही आणि त्यामुळेच शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. Agriculture Minister Dada Bhuse's crop inspection tour

हे देखील पहा -

गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगातर्फे जिल्हा परिषद त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकी संदर्भातील धुळे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आल्याने कृषिमंत्र्यांना पाहणी दौरा करता आला नव्हता. मात्र कालच राज्य निवडणूक आयोगातर्फे जुलै महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणूका डेल्टाप्लस व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्यानंतर आज धुळे जिल्ह्यात पिक पाहणी दौरा केला असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले .

कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतात जाऊन पिक पाहणी केल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा राहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. तसेच यानंतर पाऊस पडल्यानंतरही शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये मोठी घट देखील येणार असल्याचे म्हणत त्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे आवश्यक ती मदत शेतकऱ्यांना केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोसळधार! राज्यात पावसाचे ७ बळी; मराठवाड्यात ११ जण बेपत्ता, कुठे कशी परिस्थिती?

Maharashtra Rain Live News: मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Pune Monsoon Update : पुण्याला आज रेड अलर्ट, मुसळधार पावसाने झोडपले, पुणेकराच्या पाण्याचे टेन्शनही संपवले

Kisan Vikas Patra: ११५ महिन्यात पैसे होणार डबल; किसान विकास पत्र योजनेत मिळतो सर्वाधिक परतावा

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचे हे उपाय तुम्हाला करतील मालामाल, आर्थिक तंगी होईल दूर

SCROLL FOR NEXT