शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते, असा दावा त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मुख्य म्हणजे 'ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होईल, त्या दिवशी आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते', असं देखील तिवारी म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
'आदित्य ठाकरे तुम्ही मंत्री होता. तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना, दिशा सालियानच्या घरी पार्टी होती. त्यावेळी सालियाननं आत्महत्या केली होती. त्यावेळी पार्टी अडेंट करण्यासाठी आदित्य ठाकरे गेले होते. मी नसतो तर, आदित्य ठाकरे यांना अटक झाली असती, मी त्यावेळी मीडियाला दाखवून दिलं, हे भाजपचे कटकारस्थान चालू देणार नाही'.
'आदित्य ठाकरे यांना आजही अटक होऊ शकते. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होईल, त्या दिवशी आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते', असा खळबळजनक दावा तिवारी यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.