सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा निर्णय
निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली निवड
नितेश राणे यांची निवडणूक प्रभारी म्हणून निवड
जालन्याचं आराध्य दैवत मत्स्योदरी देवी मंदिर परिसर 11 हजार दिव्यांनी लखलखलाय. अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी मंदिरावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अंबड तहसीलदारांस परदेशी पाहुण्यांची देखील उपस्थिती होती. पौर्णिमेनिमित्त अंबड शहरासह परिसरातील हजारोच्या संख्येने भाविकांनी मत्स्योदरी देवीचे दर्शन घेतले.
जालन्यात बैल विकून शेतकरी झाला लखपती झालाय
कानफोडी तांडा येथील बिजल्या धावायचा घोड्यासोबत....
घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्याची ओळख,शंकर पटातला बैल असल्यानं मिळाली जास्त किंमत
नाशिकच्या येवला तालुक्यात नगर मनमाड महामार्गावर बाबुळगाव शिवारातील हॉटेल अपेक्स समोर स्कोडा कार व प्रवासी रिक्षा यांच्यासमोर समोर झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू असून सर्व प्रवासी येवला तालुक्यातीलच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मनमाड नगर महामार्ग हा मृत्यूचा सापळा असल्याचा पुन्हा एकदा सिद्ध झालं असून वाढलेली वाहतूक अपघाताला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे
आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने अकलूजमध्ये अकलाई देवी मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. लक्ष..लक्ष.. दिव्यांनी मंदिर व परिसर उजळून निघाला आहे.
हजारो भाविकांनी पणती आणि दिवे लावून दिपोत्सव साजरा केला.
दरवर्षी अकलाई देवी मंदिरात दिपोत्सव साजरा केला जातो.
अकलाई देवीच्या आरतीने सांगता झाली. यावेळी जयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
लाखो दिव्यांनी उजळले दगडूशेठ मंदिर
मंदिरावर दिव्यांची आरास
आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लाखो दिव्यांची आरास
भक्तांनी केली पाहण्यासाठी गर्दी
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने वाघोली येथील श्री वाघेश्वर मंदिरात सोमवार आज ११ हजार दिव्यांचे भव्य प्रज्वलन करण्यात आले.
हा मनमोहक दीपोत्सव पाहण्यासाठी परिसरातील अनेक भक्त, ग्रामस्थ, महिला, पुरुष व लहानग्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या दीपोत्सवाचे आयोजन शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान, वाघोली विकास प्रतिष्ठाण तसेच वाघोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण मंदिर परिसर ११ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. वातावरणात धार्मिकता आणि भक्तीभावाचे तेज पसरले होते.
दीप प्रज्वलन कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, उपाध्यक्ष रामदास दाभाडे यांच्यासह ट्रस्टचे सभासद, ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्यात
राज ठाकरे घेणार शहरातील मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक
उद्या सकाळी १० वाजता घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक
महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्या पुण्यात
हातात तलवारी घेऊ एकमेकांच्या अंगावर धावून गेले
तर एकमेकांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड
अमरावती येथील बजरंग टेकडी परिसरातील घटना...
हाणामारीचा CCTV समोर...
राजापेठ पोलीस ठाण्यात एक मेकांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल...
मुलीच्या प्रेमापोटी सावंत यांनी दिला राजीनामा
राजेश सावंत यांची मुलगी शिवानी माने या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडून रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार
पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपच्या उमेदवाराचच काम करणार
- सोहळ्याला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
- विशेष म्हणजे भूषण गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपतोय, त्यामुळे या कार्यक्रमात भूषण गवई यांचा सत्कार
स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे.
पुण्यात उबाठा शिवसेना गटाची बैठक
8 नोव्हेंबरला पुण्यात बैठक
पुणे महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर होणार बैठक
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांची बैठक
बैठकीला सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर याच्या उपस्थितीत होणार बैठक
पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्रित तयारीत
नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे होत आहे विस्तारीकरण
विस्तारीकरणासाठी एनएमआरडीएच्या माध्यमातून अंमलबजावणी होत आहे.
अंमलबजावणी होत असताना स्थानिक शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी विरोध केलाय.
रस्त्याला विरोध नाही मात्र अतिरिक्त जागा संपादित करणाऱ्यास विरोध
गिरीश महाजन पाहणी करून मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार आहेत.
आज सकाळपासून नाशिकच्या मनसे कार्यालयात आढावा बैठकीला सुरुवात
- जिल्ह्यातील सर्व 11 नगरपरिषद निवडणूक मनसे लढणार, बैठकीत निर्णय झाल्याची नेत्यांची माहिती
प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल केलं. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर उपचार सुरू. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू, मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती.
धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊन मनुष्य व पाळीव जनावरांची देखील जीवित हानी झाली.या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंद्र सरकारच्या पथकाने ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात पाहणी केली.
पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. सोने, चांदी, मोबाईल पाठोपाठ आता महागड्या दुचाकीचे स्पीडोमीटरची चोरी होण्याचे प्रकार सुरू झाले आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात डिलिव्हरी बॉय ने एका सोसायटी मध्ये प्रवेश घेत महागड्या दुचाकीचे मीटर चोरी केल्याची घटना समोर आली.
शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
भाजपसोबत युती करणार नाही.
भाजपा सोडून इतर पक्षांशी युती करणार
मतदार याद्यांमधील घोळ शुद्धीकरण न करताच निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील 288 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या मात्र निवडणूक आयोगाच्या या घोळावर आता मनसेने आक्षेप घेत निशाणा साधला आहे.
दुबार मतदारांच्या प्रश्नावरून निवडणूक आयोगाने दोन स्टार तीन स्टार देण्याचा विचार मांडला आहे मात्र यावरूनच आता मनसेने निवडणूक आयोगावर निशाणा साधताना म्हटले आहे
निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारा आयोग असून त्यालाच आता रॉकस्टार दिला गेला पाहिजे
धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का,जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा
दुधगावकर यांनी जिल्हाध्यक्ष पदासह सक्रीय सदस्य व प्राथमिक सदस्यपदाचा ही दिला राजीनामा
दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय निंबाळकर यांचाही सदस्यत्वाचा राजीनामा, निंबाळकर यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडुन लढवली विधानसभा निवडणूक
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवला राजीनामा
ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजीनामा देण्याचे कारण अस्पष्ट,दुधगावकर कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे लागले लक्ष?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जास्तीतजास्त मतदान करावं असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि एका पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असल्याचे राहुल कर्डिले यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सुरू असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. गोविंदवाडी बायपास ते मोठागाव मानकोली पुलापर्यंतचा हा टप्पा पुढील आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे.
आयुक्त गोयल यांनी या मार्गावरील अडथळ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी पुनर्वसन आणि मोबदला प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेऊन जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या रिंगरोडच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, मानकोली परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फलटण येथील महिला डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने याला सेवेतून केले बडतर्फ...
पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून समाजात असुरक्षित भावना निर्माण होईल असे वर्तन केल्याप्रकरणी झाली कारवाई...
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी केली कारवाई...
महाड भोर मार्गावरील वरंधा घाटात मोटर सायकलला झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वाराचा मृत्यु झाला आहे. शिवाजी ढेरे राहणार भोर असे मृत मोटर सायकल स्वाराचे नाव आहे. वरंधा घाटातील तीव्र उतार आणि वळणांवर मोटर सायकलवरील नियंत्रण सुटले आणि मोटर सायकल स्वार रस्त्यावर आदळला यामध्ये डोक्याला गांभिर दुखापत होऊन मोटर सायकल स्वाराचा मृत्यु झाला. या प्रकरणी महाड MIDC पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
उद्धव ठाकरे भुम तालुक्यातील पाथ्रुड गावात दाखल
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद,
ठाकरे यांच्या समोर व्यथा मांडण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी दाखल
पैशावरून झालेल्या भांडणातून वाहन चालक प्रियकारावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून करणाऱ्या परिचारिकेला पुणे न्यायालयाने जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सविता प्रकाश जाधव असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे.तर प्रवीण ज्ञानोबा भाग्यवंत अस खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
खून केल्याप्रकरणी मयताच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
ही घटना 3 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी पिंपरी चिंचवड मध्ये विठ्ठलनगर येथील एका सोसायटीत घडली होती
प्रवीण भाग्यवंत हे पिंपरी चिंचवड महापालिकेत वाहन चालक म्हणून कार्यरत होते तर सविता परिचारिका म्हणून काम करायची.दोघांमध्ये आठ वर्षापासून प्रेम संबंध होते.त्यांच्यात पैशाच्या कारणांवरून वाद सुरू होते. त्यातून सविताने प्रविणेच्या गळ्यावर, छातीवर आणि डोक्यात कुऱ्हाडीने वार केले होते,मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या प्रवीणचा मृत्यू झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सविताला अटक करून न्यायालयात आरोप पत्र दाखल केली यावरून पुणे सत्र न्यायालयाने सविताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
उजळाईवाडी येथील महामार्ग परिसरात मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न
ऊस आंदोलन चिघळलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्याने शेतकरी संघटना आक्रमक
प्रभाग क्रमांक २० मध्ये एकाच व्यक्तीची तीन ठिकाणी नावे आढळल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. BJP प्रभाग २० चे वार्ड अध्यक्ष संतोष खंडू जाधव यांच्या नावावर तीन वेगवेगळे EPIC कार्ड असल्याचा दावा मनसेने केला असून, अधिकृत यादीतही तिन्ही ठिकाणी टिक झाल्याचे सांगितले आहे. मतदारयादीतील या अनियमिततेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी निवडणूक आयोगाकडे तातडीने तपासणी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिवाय वोट जिहाद वर बोलताना यमुनाबाई गणपत कांबळे यांच्या फोटोऐवजी एका मुस्लिम महिलेचा फोटो निवडणूक यादीत लावण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वैजापूर येथे शिवसेनेचा मेळावा खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संदिपान भुमरे उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात हा मेळावा सुरू होईल.
आज उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत त्यांनी बीडच्या पाली मधील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे समोर व्यथा मांडले असून आम्हाला तात्काळ कर्जमुक्ती हवी आहे त्याचबरोबर दिलेली मदत ही पुरेशी नसून सरकारने शब्द पाळला नाही असे मत साम टीव्हीशी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे ज्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे समोर आपल्या व्यथा मांडल्या
वनविभागाने रस्त्याचे काम रोखले, स्थानिकांची मोठी गैरसोय
पंढरपूर तालुक्यातील शेवते ते आव्हे या दोन गावांना जोडणार्या रस्त्यावर वनविभागाने चार काढून रस्ता बंद केला आहे.
रस्ता बंद झाल्याने स्थानिक ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे.
जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच
जालन्यात पाच जणांना घेतला मोकाट कुत्र्यांनी चावा
दोन चिमुकले गंभीर जखमी
मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रत्नागिरी - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच खेडमध्ये जंगी स्वागत
पदाधिकारी कार्यकर्ते बैठक आटपून रवींद्र चव्हाण स्व.मिनाताई ठाकरे नाट्यगृहात मेळाव्यासाठी दाखल
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहील्यांदाच रवींद्र चव्हाण यांचा कोकण दौरा
खेड , चिपळूण आणि रत्नागिरीत चव्हाण यांच्या महत्वाच्या पक्ष बैठका आणि मेळावे
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेकांचे होणार पक्ष प्रवेश
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीसाठी रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा महत्वाचा
बीड -
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडच्या पाली गावामध्ये दाखल
शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे.
शेतकऱ्यांनी मांडल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यथा.
मुंबई -
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कमेंट प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाकोला पोलिसांकडे कलम 196 BNS अंतर्गत गुन्हा नोंद
इंस्टाग्रामवरील भडकावू कमेंट प्रकरणी मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सलाउद्दीन (28 वर्षीय) युवक अटकेत
फिर्यादी अजित यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज समर्थनार्थ व्हिडिओ पोस्ट केला होता
आरोपीने sayyadi_hussain आयडीवरून समाजात तेढ निर्माण करणारी कमेंट केल्याचा आरोप
सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा
युती तुटल्यास सिंधुदुर्गात नितेश राणे निलेश राणे येणार आमने सामने
सिंधुदुर्गात शिवसेनेसोबत युती नको स्वबळावरच लढूया असा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.
आज रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक सावंतवाडी येथे होणार आहे.
या बैठकीत नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर येतायत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा स्वबळाचा आग्रह धरला आहे.
पंढरपूर -
भक्त पुंडलिक पालखी सोहळ्यासाठी सागवानी रथ
वारकरी साहित्य परिषदेकडून सात लाख रूपयांचा रथ भेट
पुणे -
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आंदोलन
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी ची मागणी
पुण्यातील अभिनव चौकात आंदोलन
पुणे -
निलेश घायवळवर आणखी एक मोक्का
१८ सप्टेंबर रोजी घायवळ टोळीच्या सदस्यांनी केला होता एका तरुणावर कोयत्याने हल्ला
कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता
गायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर एका तरुणावर त्याच रात्री कोयत्याने हल्ला केला होता
पुणे -
आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं ट्वीट
धंगेकरांचा मुरलीधर मोहोळं वार पुन्हा एकदा मोठा आरोप
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर केला मोहोळांच्या गुंड यांनी हल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसास प्रतिटन रु.३६१४/- ऊसदर देणार असल्याची सुधारीत घोषणा अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.
मागील महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक बीडमध्ये दाखल झालंय. बीड, शिरूर आणि आष्टी तालुक्यातील बाधित क्षेत्राची पथकाकडून पाहणी केली जातेय. बीड तालुक्यातील लिंबारुई गावातून पथकाच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात लिंबारुई गावातून वाहणाऱ्या डोंमरी नदीला पूर आला होता. याच पुराने नदीकाठची शेती बाधित झाली. शेतीसह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी देखील बुझल्या आहेत. आणि याचीच पाहणी या केंद्रीय पथकाकडून करण्यात येतेय. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याचा आढावा घेतला जातो आहे.
मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेण्यासाठी केंद्राचे पथक बीडमध्ये दाखल झाले असून शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट पाहणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे पथक बीडमध्ये दाखल झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चे उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागातील अनेक ले आउट रद्द केल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून यात काही दिग्गजांचे ले आउट रद्द च्या यादीत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.. मेहकर शहरात तत्कालीन एसडिओ गणेश राठोड यांनी जमिनी अकृषक करण्याचा सपाटा लावला होता, परिणामी नगररचना विभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष करत नगररचना विभागाने नकाशा मंजूर केलेला नसतांना देखील जमीनी एन ए अर्थात अकृषक केल्याने भूखंड माफियांनी सर्रासपणे जमिनी एन ए करून प्लॉट विकल्याने ज्या ज्या नागरिकांनी आपले घर होणार हे स्वप्न बघून आपल्या आयुष्याची पुंजी गमावली, त्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे .. आम्ही तर एन ए ३४ बघून प्लॉट घेतले आता आमचे काय होणार ? अशी अवस्था झाली आहे.. पैकी 58 ले-आउट रद्द करण्यात आले असून काहींना दिवाणी न्यायालयाने तूर्त स्थग्नादेश दिला आहे, तर काही ले आउट धारकांनी आपले एन ए प्रकरण पुनर्विलोकणासाठी दाखल केले आहेत.. सगळी प्रक्रिया झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येइल असे आश्वासन एसडीओ यांनी दिले आहे
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून आलेल्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. मोलगी परिसरातील सोराचापडा या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या सुहास धरमसिंग वसावे या तरुणाने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात नववा 9 वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर त्याची नियुक्ती होणार आहे सुहास वसावेच्या या यशाने सातपुड्याच्या कुशीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
शीख धर्मियांचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्ताने चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून चित्र रेखाटले असून,सर्व लोकांना दया,समानता,प्रेम,मानवता व विश्वबंधूतेची शिकवण देणा-या गुरुनानक देवजी यांचा संदेश चित्र रेखाटनातून त्यांना अभिवादन केले आहे.
नगरपरिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या मात्र नागपुर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच चित्र पाहायल मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने काँग्रेस सोडून समविचारी पक्षा सोबत तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केली. शरद पवार गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी यांची समविचारी पक्षासोबत बोलणी करत आहे.महाविकास आघाडीत निवडणूक लढण्याला प्राधान्य मात्र काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्यानं नाराजीचा सूर व्यक्त केला आहेय. काँग्रेस सोबतचा विधान सभेचा अनुभव चांगला नसल्यानं समविचारी पक्षाना सोबत घेऊन निवडणुकीला समोर जात असल्याचं बोललं जात आहे, असे प्रवीण कुंटे पाटील म्हणाले.
शेतशिवारात घरं बांधून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता माणसासोबतच बिबट्यांशीही दोन हात करावे लागतायत. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना शेतशिवारात लोखंडी कुंपण, लाइट्स आणि सुरक्षा यंत्रणा बसवण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव खेड शिरूर परिसरात बिबट्यांची संख्या 2 हजारांवर गेलीय तर 60 जणांचे बळी गेलेत तर 14 हजारांहुन आधिक पशुधन ठार झाले असुन अनेक ठिकाणी शेतातील जनावरे, चिमुकल्यांवर बिबट्यांनी हल्ले केल्याने भीतीचं सावट पसरलंय. शेतकरी आता स्वतःच्या कुटुंबासह शेतात राहण्यासही घाबरतोय. रात्रीच्या वेळी शेतशिवारात बिबट्यांचा वावर टिपण्यासाठी शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही आणि सौरदिवे बसवलेत, मात्र त्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला चटका लावणारा ठरतोय. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने ही दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.
नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा ता.शहादा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच दिवशी उघडते. यंदा हे मंदिर कार्तिक पौर्णिमेला अर्थात आज भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरावर दर्शना साठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश यासह जवळच्या गुजरात राज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिराचे वाशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे एकाच पाषाणात या दोन हि मुर्त्या कोरण्यात आल्या आहेत अहिलाबाई होळकरांनी हे मंदिराचे बाधकाम केल्याचे सांगितले जाते. तापी नदी काठावरील हे एकमेव प्राचीन मंदिर आहे...
सांगली शहरावर धुक्याची झालर पसरली आहे.. गेल्या काही दिवसात वातावरण निर्माण झालेला बदल आणि हवेतील गारवा आणि पाऊस यामुळे वातावरणात मोठे बदल होत आहे.. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे शहरावर धुक्याची झालर पसरली आहे.. पहाटेपासून गर्द धुके पडायला सुरुवात झाली आहे.. अत्यंत दाट आणि पुढचे काही न दिसणारा असं दाट धुके शहरवासीय अनुभवत आहेत... यामुळे गुलाबी थंडीत सांगलीकरांना धुक्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे...या धुक्यातुन सांगलीकर वाट काढत होते.
भंडारा जिल्ह्यातील मोहगाव (करडी) येथील शिवम कृषी केंद्र या दुकानाला रात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. या आग लागल्याच्या घटनेमुळे कृषी केंद्रातील खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून,ही आग कोणीतरी अज्ञात व्यक्ती कडून लावण्यात आली असल्याचा बोलले जात आहे.या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.घडलेल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कृषी केंद्राला आग लावणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कोल्हापुरात आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूरकरांनी तब्बल ५१ हजार दीप पणत्या लावून घाट उजळून टाकला. फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावट यामुळे संपूर्ण घाट दैवी प्रकाशाने न्हाऊन निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय मिळवला, या आनंदात दिवे लावून ‘देवदिवाळी’ साजरी करण्याची परंपरा आहे. कोल्हापुरात या दिवशी अंबाबाई मंदिर, पंचगंगा घाट आणि शहरातील विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. आज पहाटे हजारो दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर दैवी तेजाने झळाळून गेला. हा सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच पंचगंगा नदी घाटावर कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.
सतत ढगाळ वातावरण अधून मधून सरी आणि अस्थिरवामामुळे पुणेकर ह्याला झाले होते परंतु आता पावसाने हकीर विश्रांती घेतली असून हवेतील गारवा वाढू लागला आहे पुढील तीन ते चार दिवसात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे परिणामी शहरातील थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
वेल्हे (ता.राजगड) येथील गुंजवणी धरण परिसरात असलेल्या एका खाजगी रिसॉर्ट परिसरात आढळलेल्या बारा फुटी अजगरास सर्प रक्षक व वन विभागाच्या पथकाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.गुंजवणी धरण परिसरामध्ये एका खाजगी रिसॉर्ट च्या परिसरात मोठा अजगर रिसॉर्टच्या व्यवस्थापक संतोष भोंडेकर यांना आढळला. यानंतर भोंडेकर यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे याची माहिती पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य विशाल नगीने व विकास भिकूले व वन कर्मचाऱ्यांना दिली. काही वेळातच घटनास्थळी वन कर्मचारी व सर्पमित्र यांनी रेस्क्यू मोहीम सुरू केली.या मोहिमेत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनपाल वैशाली हाडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सारिका भैमुले,भाग्यश्री जगताप,स्वप्नील उंबरकर व निखिल रासकर यांनी व विकास भिकुले, विशाल नगिने यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वयातून अजगराला जखमी न करता अत्यंत शिताफीने पकडण्यात आले.यानंतर या अजगराला वनविभागाच्या देखरेखीत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.या कारवाईदरम्यान वनविभागाने सर्पमित्रांचे विशेष आभार मानले. तसेच, सर्प व इतर वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी अशा प्रसंगी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
पोलिस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या (Rohit Arya) प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होताच शहरातील मैदानांवर मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील व जिल्ह्याच्या विविध भागांतून इच्छुक तरुण मैदानात मेहनत घेताना दिसत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील १६१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे, ज्यात १५० जागा पोलीस शिपाई पदाच्या आहेत, तर ११ जागा बॅन्ड्रसमनच्या आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मैदानावर तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. तरुणांमध्ये पोलीस दलात दाखल होण्याची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
गेले अनेक महिन्यांपासून लष्कर भागामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने, अनियोजित व अनियमित पद्धतीने होत असल्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने नागरिकांची सह्यांची मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेल्या सह्यांचा बॅनर लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला. तसेच तो बॅनर विभागाच्या कार्यालयाच्या गेटवर लावण्यात आला आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले.या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.