महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बस दाखल होणार
या नव्या बसना ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
कराडला मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची
दहा वाजता आलेल्या उमेदवाराला मतमोजणी केंद्रावर प्रवेश नाकारला
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला अडवले
निवडणूक निर्णय अधिकारी मनमानी करत असल्याचा थेट आरोप
गोदा घाट परिसरात बॅरॅकेट पडले पाण्यात
गोदाई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बॅरॅकेट काढले बाहेर
पोलिसांनी लावलेले बॅरॅकेट वाहनांच्या धडकेने पडले होते पाण्यात
रामकुंड परिसरात सिंहस्थाचे काम सुरू असल्याने लावण्यात आले होते ब्रॅकेट्स
प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून बाहेर काढले अडकलेले बॅरॅकेट्स
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील मेंढवन घाटात लावण्यात आलेल्या स्ट्रीटलाईट मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच दुर्लक्ष असल्याच चित्र पाहायला मिळतंय . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण घाटात अपघातांची वाढती संख्या पाहून या ठिकाणी काही वर्षांपूर्वी स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या . साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर वरती या स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या असून ह्या स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने वाहन चालक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना पुसद येथील इटावा ट्रॅव्हल्स पॉईंट्स परिसरात घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाने पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आणली मात्र ट्रॅव्हल्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अंजली ट्रॅव्हल्स ही पुसद ते पुणे प्रवाशी घेऊन जाण्यासाठी पुसद येथील इटावा ट्रॅव्हल्स पॉईंट येथे मध्यरात्री दरम्यान उभी असताना ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली आग लागतात काही क्षणातच ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.
उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकिवरून उदय सामंत यांनी टोला लगावला आहे
संख्याबळावर ही निवडणूक असते
237 आमदार आमच्याकडे आहेत, समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे
त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, याची पूर्ण कल्पना एक कार्यकर्ता म्हणून मला आहे
पुणे शहरात महानगरपालिकेची मोठी कारवाई
महापौर निवडी आधीच पालिकेने अतिक्रमणावरती हातोडा
खराडी बोराटे वस्ती येथे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढत कारवाई
सकाळपासूनच या ठिकाणी सुरू आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने सहा ठिकाणी बेरिगेटिंग करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विधानसभा त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी याच ठिकाणी मोठा गोंधळ आणि राडा झाला होता, त्यामुळे आता प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली आहे दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी या परिसरातील रस्ते पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. देवीच्या मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. या रोषणाई मुळे मंदिर परीसरात झगमगाट पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी रात्री पासूनच भाविकांनी गर्दी केली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नऊ रांगाद्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेते व मुंबई नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आंगणेवाडी येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंगणेवाडी भराडी देवीच्या मंदिर परीसराची डाॅनने टिपलेली ही मनमोहक दृश्य..
उत्तर पुणे जिल्ह्यात ऊसतोड झाल्याने बिबट्याचे वास्तव्य शेतशिवारात मुक्तपणे पहायला मिळत असुन बिबट्याची शेतकरी वर्गात मोठी दहशत वाढत असुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे
शहराचे नवे महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार असून निवडणुकीत भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरले आहेत महापालिका निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने निवडणुकीत तसेच चुरसही नाही दोन्ही पदांवर भाजपचाच उमेदवार निवडून येणार हे नक्की असल्याने एका परीने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे
सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्याने शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोड वाढू लागला आहे प्रामुख्याने हवेली परिसरासह एनडीए शिवाजीनगर खडकवासला आणि पाषाण परिसरातील बारा एक ते 20 यांनी घटला आहे त्यामुळे रात्री थंडीचा जोर वाढला आहे एकीकडे थंडी वाढत असताना दिवसात कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे दुपारी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत
तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाली मात्र प्रवासी संख्या घटली असून ती वाढवण्यासाठी पीएमपीएल प्रयत्न करणे आवश्यक आहे 2025 मध्ये तिकीट विक्रीतून पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपये उत्पन्न मिळाले
प्रवासी संख्या 1 कोटी 28 लाख इतकी होती 2024 मध्ये 581 कोटी 57 लाख रुपये उत्पन्न मिळाले असून प्रवासी 1 कोटी 37 लाख होती
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिकीट दर वाढीमुळे वार्षिक उत्पन्नात 98 कोटींनी वाढ झाली मात्र प्रवासी संख्या नऊ लाखांनी घटल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.