धाराशिव -
परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
सहा दरोडेखोरा बरोबर 70 वर्षीय माजी सैनिकांचा निकाराचा लढा
हल्ल्यात माजी सैनिक गंभीर जखमी पुण्यात उपचार सुरू
यवतमाळ - जिल्ह्यात 25 दिवसात 18 शेतकऱ्यांनी संपविले जीवन
यवतमाळ जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा डाग शासन आणि प्रशासन पुसण्यात अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहेत.
1 ते 25 एप्रिल या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 18 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटावळे असून नापिकी आणि शासनाचे उदासीन धोरण या आत्महत्यांना कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
रायगड -
- रायगडच्या लोणेरे येथील तरुणी हत्याकांड प्रकरणातील सर्वात मोठी बातमी
- आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार याला अटक
- रायगड पोलिसांची मोठी कामगिरी
- पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठ यश
- लोणेरे येथील लॉजवर तरुणीवर बलात्कार आणि खुन करून सहा दिवसांपासून आरोपी नराधम होता फरार
- पिडीत मृत तरुणी पल्लवी मोरे हिच्यावर लैंगिक अत्याचार करून केली होती निर्घृण हत्या
- नवी मुंबई परिसरात पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती
नाशिक -
- अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती
- कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर ठेवण्यात आले होते लक्ष
- महिलांसोबतच्या कृत्यांचे CCTV फुटेज समोर आल्याची माहिती
- ऑफिसबॉयनंतर कुकनेही केला खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड
नाशिक -
- TCS प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम
- मोबाइल तपासात कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड
- नोकरी सोडल्यानंतरही आरोपींशी सतत संपर्कात असल्याची माहिती
- दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ सापडले
- SIT कडून डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण सुरू
- आरोपी आणि निदा खानच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी
पुणे -
ड्रायव्हरनेच मारला मालकाच्या घरी डल्ला
मालकाच्या आईचे 15 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास
राजेश कांबळे असं चोर असलेल्या ड्रायव्हरचं नाव
विमानतळ पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक
पुणे -
पुण्याचे तापमान 40 अंशांच्या पुढे
रात्रीच्या तापमानातही वाढ पुढील दोन दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज
शहरात कालपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन ते 40.9 अंशावर पोहोचले लोहगाव परिसरात 42° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली रात्रीच्या तापमानातील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली
गेल्या आठवड्यात शहरात घरांचा पाऊस पडला होता मात्र हवामानातील प्रतिकूल घडामोडींमुळे चार दिवसांपासून पारा 39 ते 41 अंशामध्ये बेंगाळत आहे
पुणे शहराबरोबरच जिल्हासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात तापमानात लक्षणे वाढ झाली आहे.
जळगाव -
जळगावात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे लागले बॅनर
जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक सह वेगवेगळ्या चौकांमध्ये प्रतापराव पाटील भावी आमदार अशा आशयाचे लागले बॅनर
प्रतापराव पाटील यांचा 28 एप्रिल रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्ताने भावी आमदार कार्यकर्त्यांनी लावले बॅनर
मुंब्रा -
मुंब्रा चुहा खाडी प्रकरण नताशा आव्हाड यांची पाहणी; अधिकाऱ्यांवर टीका
मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी चुहा खाडी पुलाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
खाडीत बेकायदेशीर भराव टाकून खारफुटी व झुडपे नष्ट केली जात असल्याचा आरोप
चुहा पुलावर मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात असून पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली..
चुहा पुल ते दिवा रस्ता बंद करण्याचे आदेश कोणी दिले?खाडीभोवती भिंत बांधण्याचा निर्णय कोणी घेतला?
"खाडी भरणे थांबले नाही तर पावसाळ्यात मुंब्रा पाण्याखाली जाऊ शकतो;त्याची जबाबदारी संबंधितांवर असेल"
वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार करणार
डंपरद्वारे माती टाकून खाडी भरली जात असल्याचा आरोप केला आहे
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील वरुड–मुलताई मार्गावर ताज फ्रुट कंपनीला भीषण आग, आगीत कोट्यवधींचे फ्रुट कॅरेट जळून खाक, कोट्यावधी चे नुकसान
या आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच नरखेड, काटोल आणि बैतुल येथील अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी लावला तगडा बंदोबस्त..
लागलेली आग पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी केली गर्दी क
आग आग कशाने लागली याचा शोध लागला नसून आगीचे कारण अस्पष्ट आहे...
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय भाजपाने घेतला
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याचा सत्ताधारी भाजपाचा निर्णय
मराठी शाळा सुरू ठेवण्यासाठी शिवसेनेकडून कोर्टात याचिका.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे.
महानगरपालिका शाळेत एकूण ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षण धोरणात सुधारणा करून या शैक्षणिक वर्षापासून मराठी मिडीयम बंद करण्याचा घाट भाजपाने घेतला आहे. तसा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आलाय.
या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात मराठीवर अन्याय न करता , मराठी आणि
इंग्रजी मिडीयम असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
असे न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांनी दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.