Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी दिल्या जाणार

Marathi Breaking Live Headlines Updates : संसदेचे पावसाळी अधिवेशन, शरद पवारांचे खासदार मोदींना भेटणार, मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली बारवी धरण 'ओव्हरफ्लो'

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूर जवळील बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून आज पहाटे 4 वाजता धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी धरण क्षेत्रात आतापर्यंत २

2002 मिलीमीटर इतक्या दमदार पावसाची नोंद झालीय. त्यामुळे धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालय. आज पहाटेपासून धरणाच्या सर्व 11 दरवाजांमधून 2500 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मिरा-भाईंदर, आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा पाणीपुरवठा केला जातो. धरण पूर्ण भरल्यामुळे आता ठाणे जिल्ह्याची आगामी वर्षाची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे.​धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.

सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यातील जंगलात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. निसर्ग अभ्यासक विकास माने हे दोडामार्ग पट्ट्यात भ्रमंती करत असताना त्यांनी या पट्टेरी वाघाचा मुक्त संचार कॅमेर्‍यात कैद केला आहे.

सिंधुदुर्गच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल 12 पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याची नोंद यापूर्वीच वनविभागाकडून करण्यात आली आहे. हा परिसर सह्याद्री- कोकण वन्यजीव भ्रमणमार्गावरील महत्त्वाचा परिसर आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल हे जैवविविधतेने विपुल असल्याच पुन्हा अधोरेखित झाल आहे.

अर्धा पावसाळा संपला; लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही

पावसाळ्याचा निम्मा कालावधी उलटून गेला, मात्र लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहे.

पुणे विमानतळावर विक्रमी 219 उड्डाणे

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एका दिवसात सर्वाधिक 219 विमानांच्या उड्डाणाची नोंद झाली आहे

गोवा जळगाव आणि मुंबई या मार्गावर अतिरिक्त विमानसेवा सुरू झाल्यामुळे विमानांच्या संख्या वाढली आहे गेल्या रविवारी नोंदवलेल्या 216 विमानांच्या हालचालीचा विक्रम अवघ्या आठवड्यातच मोडला गेला.

पिक विमा भरण्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर स्लो असल्याने शेतकऱ्यांना फटका

पीकविमा भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे.पीक विम्याच्या सर्व्हरचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.दिवसभर सर्व्हर स्लो असल्याने अनेक शेतकरी तासंतास सेंटरवर थांबत आहेत. काल दिवसभर पोर्टल संथ गतीने सुरु होते. त्यामुळे ऑनलाइन विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची भीती आहे.धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 93 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी भरला पीक विमाआहे.आज मुदत संपत असल्याने सर्व्हर सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे

उल्हासनगरमध्ये मेट्रो येण्यापूर्वीच श्रेयवादाची ‘सवारी’; भाजपा-शिवसेना आमनेसामने

मुंबई मेट्रो-५ च्या दुसऱ्या टप्प्यात उल्हासनगरपर्यंत मेट्रो येणार असून, याचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी आपण केलेल्या पत्रव्यवहार आणि सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच उल्हासनगरमध्ये मेट्रो येत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याचेही त्यांनी सांगितले.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी दिल्या जाणार

पुणे महापालिकेच्या यापूर्वी पाच शाळा आकांक्षा फाउंडेशन ला दिल्यानंतर आणखी आठ शाळेचा प्रस्ताव

प्रति विद्यार्थी 29 हजार रुपये महापालिका आयटीएच मुव्हमेंट आठ शाळा दिल्या जाणार

खाजगी संस्थेकडे दिल्या जाणाऱ्या आठ शाळा

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा येरवडा संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा कोंढवा पुण्यश्लोक आहिल्यादेवी शाळा औंध स्वर्गीय विठ्ठलराव तुपे शाळा हडपसर पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा कोथरूड आणि आचार्य विनोबा भावे शाळा गंज पेठ सम्राट अशोक विद्या मंदिर कर्वेनगर

पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी दिल्या जाणार

खडकवासला धरण क्षेत्रातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबवला

धरण क्षेत्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.

धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेले घट यामुळे कालपासून मुळा मुठा नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणे काठोकाठ भरली आहेत.

त्यामुळे खडकवासला धरणातून आतापर्यंत १३.७९ टीएमसी पाण्याचा विसर्ग मुठा नदीत झाला आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला आणि ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज सकाळी प्या हे 4 हेल्दी ड्रिंक्स; कोलेस्ट्रॉल आणि हार्ट राहील हेल्दी

Panvel Tourism : हिरवीगार डोंगररांग अन् कोसळणारे धबधबे; पनवेलचा पाऊस अनुभवायलाच हवा, नक्की फिरा 'ही' ठिकाणं

Family Law Verdict: सावत्र वडिलांकडून पोटगी मागता येते का? कोर्टाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय

Monsoon Session : मोठी बातमी! 'या' राज्याचे नाव बदलणार, आज संसदेत विधेयक सादर होणार

Famous Singer : प्रसिद्ध गायक शस्त्रक्रियेदरम्यान गाणे गाताना दिसला; VIDEO होतोय तुफान व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT