Aurangabad News
Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad News: लग्नात त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि होत्याचं नव्हतं झालं; आगीमुळे उभा ऊस जळून खाक

साम टिव्ही ब्युरो

Aurangabad News: लग्न म्हटल्यावर फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष साजरा केला जातो. सर्वजण डिजेच्या तालावर ठेका धरत नाचत असतात. अशात गंगापूर गावातील एक लग्न शेतकऱ्यांसाठी मोठं विघ्न ठरलं आहे. लग्नात फटाके लावल्याने जवळ असलेल्या उसाच्या शेताला आग लागली आहे. यात शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. (Latest Aurangabad News)

गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव शेत शिवार परिसरात गट नंबर १७ आणि गट नंबर ३३ मध्ये ही दुर्घटना घडली. यात चंद्रशेखर आलोने, अवंतिका आलोने, सुरेश आलोने, दत्तात्रय आलोने आणि सुलेमान खान मोहम्मद या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. लग्नाला जाताना रस्त्यावरून जाताना मोठी वरात निघाली होती. सर्वजण ढोलताशाच्या तालावर नाचत होते. यावेळी फटाक्यांची मोठी माळ लावण्यात आली. या फटक्यांमुळे पुढे एवढे मोठे नुकसान होईल याची कोणालाही काहीच कल्पना नव्हती.

सर्व गाव लग्नासाठी निघाला होता. मात्र फटाक्यांच्या काही ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या आणि मोठा अनर्थ झाला. हातातोंडाशी आलेल्या दहा एकर उसाच्या शेताला आग लागली. यातील साडेचार एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. सदर घटनेत शेतकऱ्यांनी फटक्यांमुळेच आग लागल्याचे म्हटले आहे. गुरु सृष्टी लॉन मंगल कार्यालय येथे रविवारी लग्न सोहळा आयोजित केला होता. घडलेल्या घटनेने वधू आणि वर देखील चिंतेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT